बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

मराठी पत्रकारितेचे दीपस्तंभ : आचार्य बाळशास्त्री जांभेकर




     मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जाभेकरांचा 6 जानेवारी हा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्या निमित्ताने हा विशेष लेख . . . .
        आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अल्पावधीत महाराष्ट्र जीवनावर विलक्षण छाप टाकली आणि राष्ट्रीय विकासासाठी पोषक अशा बहुविध क्षितिजांचा विकास केला त्यामुळे त्यांना पश्चिम भारतामधील प्रबोधनाचे उद्गाते म्हटले जाते. मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी त्यांनी बजावलेले  कार्य हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविण्यासारखे आहे.
        मराठी पत्रकारितेचा पाया श्रेष्ठ दर्जाच्या संपादकाने घातला. त्यामुळे परंपरेचा सुवर्णप्रवाह विकसित झाला. प्रथम श्रेणीचे आद्य वृत्तपत्र म्हणून ¤ü¯ÖÔÖ पत्राची कामगिरी लक्षणीय अशी ठरली आहे.दर्पण हे वृत्तपत्र 1832 मध्ये काढुन मराठी वृत्तपत्रव्यवसायांचा  त्यांनी पाया घातला. दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक त्यांनीच 1840 मध्ये काढले .लोकशिक्षण ज्ञानप्रसार हाचा हेतू या उपक्रमांमागे होता.
        सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमाव्दारे सजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला. बंगालात राजाराममोहन रॉय यांनी प्रयत्नशिल अशा सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकरांनी दूरदृष्टीने बजावले.
        विलक्षण जीवन कहाणी - कोकणातील रत्नागिरी जिल्हयातील  देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी 1812 साली बाळशास्त्रींचा जन्म एका पुराणिकाच्या घरी झाला. पारंपारिक समाजात सुधारकाचा जन्म होतो. या सत्याची प्रचिती त्यांच्याही जीवनक्रमातून प्रकट होते. अज्ञान. दारिद्रय आणि रुढीप्रिय समाजाच्या अंध:कारातून बाहेर पडण्यासाठी सन 1825 साली ते मुंबईत आले. मुंबईत बापू छत्रे यांच्या निवासस्थानी राहून त्यांनी अध्ययनाचा शुभारंभ केला. आपल्या विलक्षण बुध्दीचातुर्याने तल्लख स्मरण शक्तीने त्यांनी त्या वेळच्या मुंबईतील सार्वजनिक जीवनावर विलक्षण छाप टाकली. सन 1830 मध्ये हिंद शाळा पुस्तक मंडळाचे  सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि एक नवे क्षितिज त्यांच्यासाठी खुले झाले. सन 1831 साली त्यांनी ग्रंथ रचनेस प्रारंभ केला. त्यानंतर वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण पत्राची मुहूत्रमेढ रोवली. मराठी पत्रकारितेच्या विचार विश्वात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरासारखी विलक्षण कामगिरी बजावणारे बाळशास्त्री जांभेकर हे त्यामुळे युगप्रवर्तक पत्रकार ठरले. सन 1834 साली भारतातील पहिले प्राघ्यापक ( ¯ÖÏÖê±êúÃÖ¸ü)  होण्याचा बहुमान त्यांना
                                                                                                    
मिळाला. एलफिस्टन निधीतून त्यांच्यासाठी स्वतंत्र अध्यासन निर्माण करण्यात आले. सन 1845 साली राज्यातील शिक्षण विभागाचे संचालक होण्याचा बहुमान  त्यांना मिळाला. प्राध्यापक या नात्याने अध्ययन, अध्यापन संशोधन विस्तार ही कार्ये पार पाडण्यात त्यांनी धन्यता मानली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्नशिल वैचारिक चळवळ सुरु केली. समाज सुधारणा शिक्षणाची अभिवृध्दी तेच त्यांनी आपले जीवनकार्य मानले.
        अष्टपैलू व्यक्तीमत्व -  त्यांच्या समग्र जीवनाकडे पाहिले असता त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विलोभनीय दर्शन घडते. त्यांना देशी विदेशी 9 भाषा अवगत होत्या. मराठी, इंग्रजी, संस्कृत प्रमाणेच बंगाली, कन्नड इत्यादीप्रमाणे त्यांनी विदेशी भाषंाचाही अभ्यास केला होता. त्यांच्या अभ्यासविषयात भाषाशास्त्रे, इतिहास संस्कृती, गणित, पदार्थ विज्ञान, भूगर्भशास्त्र, पुरातत्वविधा इत्यादीचा समावेश होता. या सर्व विषयात त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचनाही केली. त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये प्रामुख्याने बॉम्बे टाईम्स, कुरियर, ज्ञानोदय, ओरिएंटल स्पेक्टेटर इत्यादी पत्रांनी वारंवार प्रशंसा केलेली आढळते त्यांच्या समाजकार्याची नोंदही घेतलेली दिसते. तत्कालीन शाळा खात्याने त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. मुंबई न्यायालयाचे त्यावेळचे न्या. सर टी. ई. पैरी यांनी त्यांचा गौरव केला होता. रे. डॉ. विल्सन, न्या. चंदावरकर या तत्कालीन विद्वानांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या लोकाभिमुख विव्दतेचा गौरव केला होता. भारतीय राष्ट्रवादाचे पितामह दादाभाई नौरोजी हे जांभेकरांचे विद्यार्थी होते. त्यांनी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना म्हटले आहे, ते पश्चिम भारतखंडातील अर्वाचीन विव्दान मुकुटमणी, प्रख्यात पंडीत अव्दितीय विव्दान होते. ´ÖãÓ²Ö‡Ô­ÖÖ ÃÖ´ÖÖ“ÖÖ¸ü या गुजराथी पत्राने  या शिक्षण महर्षींची स्मृती  भारतीयांनी सतत जागृत ठेवावी असे आवाहन केले होते. 17 मे 1846 रोजी  जांभेकरांचा आकस्मित मृत्यू झाला. पण अल्पावधीत त्यांनी बजावलेले कार्य महाराष्ट्र जीवनाचा कायापालट करणारे ठरले.
        समाजसुधारक चळवळीचा आदर्श -  प्राध्यापक या नात्याने केवळ अध्यापन संशोधनात ते व्यग्र होते असे नाही तर त्यांनी राष्ट्रीय जीवनात अनेक प्रागतिक चळवळींना गती दिली. सामाजिक प्रबोधनासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे साधन नाही हे ओळखून त्यांनी बंगाली वृत्तपत्रापासून प्रेरणा घेतली ! 
        राजाराममोहन रॉय यांचे कार्य आणि बंगाली पत्रांनी केलेला झंझावाती प्रचार यामुळे भारुन जाऊन जांभेकरांनी नव्या पत्राचा संकल्प केला तो कृतीत आणला. ध्येयवादी बंगाली पत्राचा वस्तुपाठ जांभेकरांनी गिरविला त्यातून नवीन लोकचळवळ महाराष्ट्रात सुरु झाली. गंगा - जमनी व्दैभाषिक पत्र ही परंपरा बंगालातून महाराष्ट्रात पुढे आली. अशा या थोर आद्य पत्रकारास आपले लाख, लाख प्रणाम    
                                                                          
                                                                                                              जगन्नाथ पाटील