गुरुवार, २५ जून, २०१५

श्री अग्रसेन सहकारी पतपेढीच्या दोंडाईचा येथील मालमत्तेचा जाहीर लिलाव

धुळे, दि. 25 :- शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील श्री अग्रसेन सहकारी पतपेढी मर्यादित,शाखा दोंडाईचा  सिटी सर्वे क्र.730 पैकी क्षेत्र 288.2 चौ. मी. चा जाहीर लिलाव दि. 4 जुलै, 2015 रोजी तहसिल कार्यालय, शिंदखेडा  येथे सकाळी 11-00 वाजता ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्व संबंधीतांनी या जाहीर लिलावास उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार श्रीमती गायत्री सैंदाणे  यांनी  केले आहे.

000000

श्री समर्थ सहकारी पतपेढीच्या दोंडाईचा येथील मालमत्तेचा जाहीर लिलाव

धुळे, दि. 25 :- शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील श्री  समर्थ सहकारी पतपेढी मर्यादित,शाखा दोंडाईचा  सिटी सर्वे क्र.742/3 पैकी क्षेत्र 48.91 चौ. मी. तळमजला गाळा नं. 1, 2, 8, 9 (खुशी कॉम्प्लेक्स) एकूण चार गाळांचा जाहीर लिलाव दि. 3 जुलै, 2015 रोजी तहसिल कार्यालय, शिंदखेडा  येथे सकाळी 11-00 वाजता ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्व संबंधीतांनी या जाहीर लिलावास उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार श्रीमती गायत्री सैंदाणे  यांनी  केले आहे.

000000

कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांचे आवाहन


धुळे, दि. 25 :- पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे.  जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात  जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे,  जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जे. आर.  वळवी, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, श्रीमती हेमांगी पाटील,  जिल्हा कोषागार अधिकारी बी. डी. पाटील, तहसिलदार दत्तात्रय शेजूळ, जिल्हा सूचना अधिकारी महेश खडसे, जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख जितेंद्र सोनवणे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
            आर्वी ता. जि. धुळे येथून यावर्षी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचा प्रारंभ झाला असून जिल्ह्यात दीड लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. जे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करतील त्यांनी  या वृक्षांची जोपासना करावी, असेही जिल्हाधिकारी अण्ण्णासाहेब मिसाळ यांनी यावेळी सांगितले.  यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी   लिंब, करंज  सागवान, काशिद अशा दिर्घ काळ टिकणाऱ्या वृक्षांचे वृक्षारोपण  करण्यात  आले. 

0000000