शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०१५

मतदारांकडून आधार क्रमांक गोळा करण्यास तसेच आधार क्रमांक मतदार ओळखपत्रास लिंक करण्यास स्थगिती

 भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राष्ट्रीय मतदारयाद्या शुद्धीकरण  प्रमाणीकरण कार्यक्रमाची (National Electoral Rolls Purification and Authentication Programme) अंमलबजावणी करण्यात येत होतीया कार्यक्रमांतर्गतमतदारांकडून त्यांचे आधार क्रमांकाबाबत माहिती जमा करण्यास तसेच त्यांचे आधार क्रमांकछायाचित्र मतदार ओळखपत्रास लिंक करण्यास स्थगिती देण्यात आली आहे.
            सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दि. 11 ऑगस्ट 2015 च्या आदेशानुसार भारतनिवडणूक आयोगाने दि. 13 ऑगस्ट 2015 च्या पत्रान्वये मतदारांकडून त्यांचे आधार क्रमांकगोळा करण्यास तसेच त्यांचे आधार क्रमांक छायाचित्र मतदार ओळखपत्रास लिंक करण्यासस्थगिती देण्यात आली आहेतसेच केंद्र शासन / राज्य शासन यांच्या कोणत्याही एजन्सी/डाटासेंटर/संस्था यांच्याकडून जनतेच्या आधार क्रमांकाबाबतची माहिती गोळा करण्यात येऊ नये त्याचा उपयोग प्रमाणिकरण  अन्य कारणासाठी करण्यात येऊ नये असेही सूचित करण्यातआले आहे.
            या कार्यक्रमांतर्गत दुबारमयत तसेच स्थलांतरि मतदारांची नावे वगळणे आणिछायाचित्र मतदार ओळखपत्रातील चुका दुरुस्त करुन प्रमाणित मतदार याद्या तयार करण्याचेकाम नियमितपणे सुरु राहणार आहे.  ज्या मतदारांची नावे वगळण्याचे प्रस्तावित आहे अशामतदारांच्या नावाची यादी मुख्य निवडणूक अधिकारीमहाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाच्याceo.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
            याबाबतच्या सूचना सर्व जिल्हाधिकारी  जिल्हा निवडणूक अधिकारी यांना देण्यातआल्याचे अवर सचिव  उप मुख्य निवडणूक अधिकारीमहाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.
०००००

शिधापत्रिकाधारकांसाठी सप्टेंबर महिन्याचे अन्नधान्य परिमाण

मुंबई,दि.21 : मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गतकौटुंबिक शिधापत्रिकेवर सप्टेंबर 2015 साठी देण्यात येणाऱ्या अन्नधान्याचे परिमाण जाहीर झाले असून ते पुढीलप्रमाणे आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम,2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीसाठी शिधापत्रिकेवर वितरित करावयाच्या धान्याचे परिमाण प्रति व्यक्ती 2 किलो तांदूळ ,3 रुपये प्रतिकिलो असे आहे. प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींसाठी सप्टेंबर महिन्यासाठी 18 हजार 22 मे. टन तांदूळ व 27 हजार 32 मे. टन गहू असे एकूण 45 हजार 54 मे. टन अन्नधान्याचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. 
 अंत्योदयअन्न योजनेच्या लाभार्थीसाठी शिधापत्रिकेवर एकूण 35 किलो धान्य देण्यात येणार आहे. त्यापैकी 18 किलो तांदूळ व 17 किलो गहू उपलब्ध होणार आहे. अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकांसाठी या महिन्यासाठी 346 मे. टन तांदूळ व 327 मे. टन गहू असे एकूण 673 मे. टन अन्नधान्याचे नियतन मंजूर करण्यात आले आहे, असे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी कळविले आहे.

०००००

मागासवर्गातील युवकांना स्वयंरोजगारासाठी महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाचे अर्थसहाय्य

मुंबई,दि.21 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या वतीने अनुसूचित जातीतील युवकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य मिळावे, यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे.
अनुसूचित जातीतील नवबौद्ध, महार, बुरुड, खाटीक, मेघवाल, रुखी, वाल्मिकी, मेहतर आदी समाजातील युवकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाने 50 टक्के अनुदान योजना, प्रशिक्षण योजना, बीज भांडवल योजना या योजना सुरू केल्या आहेत.
यातील 50 टक्के अनुदान योजनेत प्रकल्प मर्यादा 50 हजार असून प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपयापर्यंत अनुदान देण्यात येते. तर उर्वरित रक्कम बँकेमार्फत देण्यात येते. तर प्रशिक्षण योजनेमध्ये व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य मिळविण्यासाठी व तांत्रिक व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध व्यावसायिक ट्रेडचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते.
बीज भांडवल योजनेमध्ये प्रकल्पाची मर्यादा 50 हजार ते पाच लाख रुपयापर्यंत असून प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के बीज भांडवल कर्ज 4 टक्के द.सा.द.शे. व्याज दराने महामंडळामार्फत देण्यात येते. यामध्ये महामंडळाच्या दहा हजार रुपयांच्या अनुदानाचा समावेश आहे. तसेच बँकेचे 75 टक्के कर्ज देण्यात येते.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी महामंडळाच्या मुंबई शहर/उपनगर जिल्हा कार्यालय, रुम नं.35, गृहनिर्माण भवन, तळमजला, कलानगर, बाद्रा (पू.) मुंबई – 400051, दूरध्वनी क्र. (022) 26592640 या पत्त्यावर संपर्क साधावा.

०००००