रविवार, २७ नोव्हेंबर, २०११

शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना तातडीची मदत


   शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार चव्हाण निधी या विश्वस्त संस्थेमार्फत अधिस्वीकृतीधारक पत्रकार दुर्धर आजार, अपघात, आकस्मिक मृत्यूप्रसंगी आर्थिक मदत मिळण्यास पात्र राहतील.
     हृदय शस्त्रक्रिया, हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया, अन्जोप्लास्टी, मूत्रपिंड प्रतिरोपण, रक्ताचा / इतर कर्करोग या प्रत्येक गंभीर आजारास प्रत्येकी 50 हजार याप्रमाणे मदत केली जाईल. याशिवाय इतर आजारांची यादी व अनुज्ञेय आर्थिक मदत याबाबतची माहिती सामान्य प्रशासन विभागाने 17 ऑक्टोबर, 2011 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात देण्यात आली आहे.
     शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी कल्याण निधीमधून मदत मिळण्यासाठी मुंबई / मुंबई उपनगर जिल्हयातील अर्जदारांनी उपसंचालक (वृत्त), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मादाम कामा मार्ग, राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई 400032 यांच्याकडे व उर्वरित जिल्हयातील अर्जदारांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकीत प्रतींसह अर्ज करावा.
     हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. 20111017130931001 असा आहे.

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

गोळीबार सराव परिसरात नागरिकांना प्रवेश बंदी


धुळे दि.25 :- पोलीस प्रशिक्षण केंद्र,धुळे येथे 47 प्रशिक्षणार्थी यांचे प्रशिक्षण सुरु असुन त्यांचा गोळीबार सराव दि.30 नोव्हेबर,2011 ते दि.1 डिसेबर,2011 पावेतो आर्वी येथे रोकडोबा फायरबट येथे होणार आहे.
      तरी वरिल तारखांना सुर्योदय ते सुर्योस्त या दरम्यान आर्वी रोकडोबा परिसरातील नागरिकांनी गोळीबार सुरु असताना त्या परिसरात गुरे व नागरिकांनी या परिसरात येऊ नये असे प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे यांनी एका प्रसिध्दी प्रत्रकान्वये कळविले आहे.

माध्यमिक व उच्चमाध्यमिक परिक्षेचे आदेवनपत्र केंद्र प्रमुखांनी विद्यार्थ्यांकडून वेळेत भरुन घ्यावेत


धुळे दि.25 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळामार्फत मार्च,2012 मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी (इ.10वी ) खाजगी विद्यार्थी थेट योजनेअंतर्गत फॉर्म न 17,अन्वये नाव नोंदणी केलेल्या पात्र विद्यार्थ्याचे मार्च,2012 परीक्षेसाठीचे परीक्षा आवेदनपत्र संबधित संपर्क केंद्र प्रमुखांनी दि.5 डिसेबर,2012 पर्यत विद्यार्थ्याकडुन भरुन घ्यावेत.असे विभागीय सचिव,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागीय मंडळ,नाशिक यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

उपसंचालक विभागीय माहिती व जनसंपर्क कार्यालयाचे नाशिकरोड आयुक्त कार्यालय परिसरात स्थलांतर



    नाशिक येथील लक्ष्मी निवास, कान्हेरेवाडी, कवी कालिदास कला मंदीराशेजारील उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती जनसंपर्क कार्यालय हे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाच्या परिसरात ``अश्विनी बिल्डींगचे बॅरॅक कक्ष क्रमांक 5, 6, 7, 8`` येथे आजपासून स्थलांतरीत झालेले आहे.
     अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9422785555, 9421455434 यावर संपर्क साधावा. या बदलाची सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे श्री. प्रसाद वसावे, उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती जनसंपर्क कार्यालय, मा. विभागीय महसूल आयुक्त कार्यालय, अश्विनी बिल्डींग, बॅरॅक कक्ष क्रमांक 5, नाशिकरोड, नाशिक यांनी कळविले आहे.

गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

जिल्हयाच्या विकासासाठी नाबार्डचा सन 2010-13 साठी 1172 कोटींचा संभाव्य ऋण आराखडा


       धुळे दि.24 नोव्हें.:- नाबार्ड प्रत्येक वर्षी पोटेन्सीयल क्रेडीट आराखडा तयार करीत असते. यावर्षी जिल्हयाच्या विकासासाठीचा सन 2012-13 चा रु. 1102 कोटीचा संभाव्य ऋण आराखडा डी. डी. एम. नाबार्ड, धुळे यांनी तयार केला असून त्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या हस्ते त्यांच्या दालनात करण्यात आले. यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मंबई चे ए.जी.एम. श्री. एस. पी. जेडे,  नाबार्ड धुळेचे ए.जी.एम. श्री. अरविंद बोरसे, लिड मॅनेजर सेंट्रल बँक धुळयाचे श्री. आर. पी. भदाणे तसेच बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नाबार्ड ने सन 2012-13 चा रु. 1102 कोटीचा संभाव्य ऋण आराखडा तयार करतांना फेड कर्जासाठी रु. 459 कोटींची तरतुद केली असून कृषी गुंतवणूक योजने अंतर्गत रु. 300 कोटींचा प्लॅन तयार केला आहे. दोन्ही मिळून कृषी क्षेत्रासाठीची संभाव्य ऋण योजना रु. 759 कोटीची आहे. जी एकूण योजनेच्या 69 टक्के आहे. कृषी पुरस्कार, डेअरी, पोल्ट्री, शेळी मेंढी पालन योजनेसाठी जवळ जवळ 125 कोटीचे पोटेन्शीयल ऋण वितरण आराखडा तयार केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार बँकांचा Credit Pla हा नाबार्डच्या पोटेन्शियल लिन्कड प्लॅन नुसार करावा लागतो. म्हणजेच 2012-13 चा बँकेचा क्रेडीत प्लॅन हा रु. 1102 कोटीचा राहील. आणि रु. 1102 कोटीच्या ऋण उपलब्धतेमुळे जिल्हयाचा विकासाला अधिकाधिक चालना मिळेल. शेतकऱ्यांडून शेतीसाठी तंत्रज्ञनाचा वाढता वापर, मंजूर टंचाई इ. गोष्टी लक्षात घेवून शेतीचे यांत्रिकीकरण, फळ लागवड इत्यादी गोष्टीसाठी प्लॅन मध्ये रु. 50 कोटीचे प्रावधान करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भंडारन योजना फ्रुड प्रोसेसिंग यासाठी रु. 75 कोटीची तरतुद केली आहे. धुळे जिल्हयामध्ये येवू घातलेल्या सोलर प्रकल्प लक्षात घेवून सुर्यप्रकाश योजनेंतर्गत रु. 1.30 कोटीची तरतूद केली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता धुळे जिल्हयाचा विकास जलद गतीने होईल.
       नाबार्डचा 2012-13 साठीची योजना ही गतवर्षापेक्षा रु. 352 कोटीने जास्त आहे. म्हणजेच 47 टक्के वाढ करण्यात आली आहे. सन 2010-11 चा रु. 340 कोटीची योजना बँकाच्या सहभागामुळे 97 टक्के साध्य झाली. हे लक्षात घेता 2011-12 चा रु.े 750 कोटीचे उद्दिष्ट सुध्दा सफल करता येईल. तसेच सन 2012-13 चा संभाव्य योजनेची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नाबार्ड कडून पुर्नवित्त, तसेच कार्यशाळा प्रशिक्षण इत्यादी नियोजन करण्यात आले आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेवून व कृषी क्षेत्र सर्वांना रोजगार उपलब्ध करु शकत नाही हे लक्षात घेवून अकृषी क्षेत्र ( Non Porm Sector) साठी जवळजवळ रु. 125 कोटीचा आराखडा तयार केला आहे. जेणे करुन शेती मालावर आधारीत उद्योगधंदे यांना चालना मिळेल. प्लॅन तयार करतांना धुळे तसेच स्वयंरोजगार मार्गदर्शनल केंद्र यांनी दिलेली माहिती विचारात घेतली आहे. तसेच आपण प्रायेरिटी सेक्टरसाठी रु. 217 कोटींची योजना तयार करण्यात आली आहे.
000 

जानेवारी 2012 पासुन निविदा व खरेदी ई-निविदा पध्दतीने मागविणार



       धुळे दि. 24 नोव्हें. :- ग्रामीण विकास विभागा अंतर्गत जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्राम पंचायत स्तरावर सर्व निविदा व खरेदी 1 जानेवारी 2012 पासुन ई-निविदा पध्दतीने मागविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ई-निविदेसाठी इच्छुक कंत्राटदारांनी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट (डी.एस.सी.) व ई-टोकन मिळविणे आवश्यक आहे. कंत्राटदारांनी डी.एस.सी. च्या सहाय्याने संकेतस्थळावर त्यांच्या नावांची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांनी ई-टोकन SIFY/TCS/GNFC/ e-Mudhra/Safe Srrypt ई. मान्यताप्राप्त प्रमाणित संस्थांकडून अथवा मान्यता प्राप्त डी.एस.सी. पुरवठादार संस्थेकडून प्राप्त करता येईल.
       योग्य त्या श्रेणीमध्ये नोंदणीकृत असलेले इच्छुक कंत्राटदारांसाठी http://demoeproc.nic.in या संकेत स्थळावर प्रायोगिक तत्वावर याची माहिती उपलब्ध असून प्रायोगिक तत्वावर नोंदणी सुध्दा करता येवू शकते. इच्छूक कंत्राटदारांसाठी स्वतंत्रपणे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. ई-निविदा प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी श्री. सय्यद शफी, उप अभियंता, पुणे भ्रमणध्वनी 9423471380 यांच्याशी संपर्क साधावा असे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांनी कळविले आहे.
000

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०११

स्त्रीभ्रूण हत्या टाळण्यासाठी गर्भलिंग निदान चाचण्यांना सक्त विरोध करणे काळाची गरज



      समाजरुपी संसाराची दोन चाके म्हणजे स्त्री व पुरुष ! समाजाची खरी जडण-घडण या दोन निकोप चाकांमधील समतोलावरच अवलंबून असते.  अलिकडेच समाजातील काही बोटावर मोजण्याइके डॉक्टर्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या पर्यायाने सोनोग्राफी सारख्या तंत्राचा गैरवापर करुन समाजाचा समतोल ढासळविण्याचा प्रयत्न  करीत आहेत.  ही आधुनिक समाजासाठी लाजिरवाणी बाब असून वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा या सुशिक्षित व पांढरापेशा समाजाच्या अट्टाहासातून आणि पैसे कमविण्याच्या लालसेतून काही डॉक्टरांचा करंटेपणा वाढतच चालला आहे. याला आळा घालण्यासाठी डॉक्टरांनीच नाही म्हणायला शिकले पाहिजे.  ज्या दिवशी डॉक्टर व आई-वडिल, नातेवाईक व समाज स्वत:हून गर्भलिंग निदानाला विरोध करतील त्यादिवशी   ख-या अर्थाने समतोल राखला जाईल.  अर्थातच स्त्री-पुरुष प्रमाणातील वाढता असमतोल ही दिवसेंदिवस अतिशय गहन अशी समस्या बनत चालली आहे.  वास्तविक मुलींची दरहजारी मुलांमागे संख्या वाढविणे गरजेचे झाले आहे यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीचे योगदान महत्वाचे ठरणार असून यासाठी राज्य शासनाने कडक धोरण अवलंबविले असून जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांचा तर गर्भलिंग निदान चाचण्यांना सक्त विरोध असून ते या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सतत प्रयत्नशिल आहेत.
      देशाच्या सन 2011 च्या जनगणनेनुसार एक हजार पुरुषांमागे 940 स्त्रिया आहेत.  महाराष्ट्रात हेच प्रमाण 925 असे चिंताजनक आहे.  पूर्वीच्या काळी मुलगी जन्माला येताच तिला मारले जायचे.  आता तर तिला जन्म घेण्या आदिच मातेच्या उदरातच मारण्याचा राक्षसी खेळ सुरु झाला आहे.  अर्थातच स्त्री-पुरुष प्रमाणाचा वाढता असमतोल ही दिवसेंदिवस अतिशय गहन अशी समस्या बनत चालली आहे.  वास्तविक मुलींची दरहजारी मुलांमागे संख्या वाढणे गरजेचे आहे.
            धुळे जिल्हयाचा विचार केल्यास दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण सन 1901 मध्ये 980 होते.  1911 मध्ये 978, 1921 मध्ये 976, 1931 मध्ये 969, 1941 मध्ये 969, 1951 मध्ये 968, 1961 मध्ये 961, 1971 मध्ये 948, 1981 मध्ये 954, 1991 मध्ये 945, 2001 मध्ये 944, व सन 2011 मध्ये 941 असून प्रत्येक जनगणनेनुसार जाहीर होणारे स्त्री-पुरुष प्रमाण हा केवळ महाराष्ट्राच्या किंवा भारताचाच चिंतेचा विषय नसून जगभराचा चिंतेचा विषय ठरला अशी परिस्थिती आहे.  सन 2011 च्या जनगणना अहवालानुसार जागतिक स्वतरावर स्त्री-पुरुष प्रमाण 984 इतके आहे.  जो 2011 च्या जनगणनेनुसार 2 गुणांनी कमी झाले आहे.
गर्भलिंग निदानावर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारने 1988 मध्ये महाराष्ट्रात प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान तंत्र नियंत्रण कायदा लागू केला.  सन 2003 मध्ये या कायद्यात आणखी महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या.  त्यातून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायदा अस्तित्वात आला.  आज या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यास शासनस्तरावरुन मोठया प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे.  याला काही अंशी यशही मिळत आहे.  काहीं डॉक्टरांनी आपले सोनोग्राफी केंद्रे बंद केली तर काहींनी सोनोग्राफी सेंटर बंद केल्याचे आरोग्य विभागास कळविले आहे.
      मातेच्या गर्भात असतांना बालकांमध्ये काही व्यंग वगैरे आहे का ? किंवा महिलेला गर्भाशयाचा एखादा आजार आहे का ? याचा शोध घेण्याच्या उदात्त हेतूने खरेतर आयन डोनाल्ड या शास्त्रज्ञाने सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा शोध लावला.  आपल्या या शोधाचा पुढे मातेचा गर्भातच उमलण्यापूर्वी कळयांना मारण्यासाठी दूरुपयोग होईल.  याची स्वप्नातही कल्पना केली नसेल.  परंतु सध्या तेच घडत आहे.  त्यासाठी केवळ डॉक्टरानांच दोष देऊन चालणार नाही.  हे खरे असले तरी गर्भलिंग निदान करणे आणि मुलीचा गर्भपात करणे हा कायद्याने गुन्हा आहे.  एवढेच लोकांना सांगून उपयोगाचे नाही.  गर्भलिंग निदान करुन द्या, अशी मागणी करणा-या गर्भवती महिलेच्या नातेवाईकांना देखील शिक्षा होऊ शकते.  ही बाब प्रत्येक नागरिकांच्या मनात खोलवर रुजविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. 
      गर्भलिंग निदानास प्रतिबंध करणा-या कायद्यातील तरतुदीमुळेही अडथळे निर्माण होतात.  स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी कायदा आहे  खरा परंतु त्यासाठी पुरावे गोळा करुन संबंधितांना शिक्षा करणे महाकठीण आहे.  एखादी महिला जर स्वत:हून ही गर्भलिंग निदान चाचणी करुन घेत असेल तर त्या गरोदर मातेला या कायद्यातील सुधारणेनुसार शिक्षाच करता येत नाही असेही तिला यासाठी प्रवृत्त करणारी सासरची मंडळी यांना शिक्षा होऊ शकते.  मात्र अशी चाचणी करुन घेणा-या कोणत्याही भारतीय संस्कारातील स्त्रीला आपल्या पतीला कठोर शिक्षा व्हावी असे कधीच वाटणार नाही.  त्यामुळे ती पतीचे नांव कधीच घेत नाही.  या कायद्याच्या अंमलबजावणीची प्रकरणे पाहिली तर या कथनातील सत्यता नक्कीच पटेल हे सर्व काही सांगण्याचे तात्पर्य हेच की, सोनोग्राफी तंत्रज्ञानाचा गर्भातील मुलगा आहे की, मुलगी आहे हे पाहण्यासाठी वापर करता येतो.  हे पालकांच्या लक्षात आणून देण्याचे महापातक डॉक्टरांनीच केले.  यात कोणाचेही दुमत नसावे.  अर्थात असे डॉक्टर बोटावर मोजण्या इतके आहेत.  केवळ पैसे कमविण्यासाठी असे पातक करण्याची मानसिकता झालेल्या डॉक्टरांनी आता तरी सावध व्हावे आणि निसर्गाचा समतोल ढासळू देऊ नये.  खरेतर प्रबोधनाची गरज आहे.  मात्र पैशासाठी कसाई बनलेल्या काही डॉक्टरांनाही या प्रबोधनाचा डोस पाजण्याची वेळ आज आली आहे.  किमान आतातरी अशा डॉक्टरांनी गर्भलिंग निदान चाचणी करुन घेण्याची इच्छा प्रगत करणा-यास नाही म्हणण्यास शिकावे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शासन सर्वच सोनोग्राफी सेंटरवर ऑब्झर्व्हर बसविण्याच्या तयारीत आहे.
                                                                    संकलन:-  जगन्नाथ पाटील,
जिल्हा माहिती अधिकारी,धुळे

दृष्टीक्षेपात धुळे जिल्हा




क्षेञफळ :- 8228 चौरस कि.मी.
भौगोलिक स्थान :-
उत्तर अक्षांस 73.50 ते 75.11
पूर्व रेखांश 73.50 ते 75.11
पर्जन्यमान :- सरासरी 544.00
लोकसंख्या :- (1991 च्या जनगणनेप्रमाणे)
पुरुष 757000     महिला 716000
शहरी 356000    ग्रामीण 1117000
अनुसूचित जाती :- 97000
अनुसूचित जमाती :-375000
साक्षरतेचे प्रमाण - 58.8 टक्के

ØÖß 46.5 ™üŒêú

पुरुष 71.2 टक्के
एकूण तालुके :- 4
धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा
महसुल विभाग :- दोन धुळे, शिरपूर
पंचायत समित्या :- 4
धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा
नगरपरिषदा :- 3
धुळे, शिरपूर, दोंडाईचा
ग्रामपंचायती :- 547
पोलीस ठाणे :- 14
पोलीस चौकी :- 11
कृषी
भौगोलिक क्षेञ :- 733000 हेक्टर
लागवडीखाली क्षेञ :- 432000 हेक्टर
ओलीखालील क्षेञ हेक्टर :- 66000
फलोद्यान खालील क्षेञ हेक्टर - --
प्रमुख पिके :- कापूस, बाजरी, ज्वारी
वनक्षेञ :- 209000 हेक्टर
सिंचन
मोठे प्रकल्प :- निरंक
सिंचनाखालील क्षेञ - निरंक
मध्यम प्रकल्प :- 6
सिंचनाखालील क्षेञ :- 52000
लघु प्रकल्प :- 25
सिंचनाखालील क्षेञ :- 14000 हेक्टर
एकूण सिंचनाखालील क्षेञ :- 66000 हेक्टर
वीज
वीज पुरवठा केलेली शहरे :- 3
वीज पुरवठा केलेली गावे :- 667
वीज पुरवठा केलेले विद्युत पंप :- 61000
सार्वजनिक आरोग्य
जिल्हा रुग्णालय :- 1
ग्रामीण रुग्णालये :- 6
प्राथमिक रुग्णालये :- 36
शिक्षण
प्राथमिक शाळा  1032
माध्यमिक शाळा 304
महाविद्यालये 64
मागासवर्गीयांसाठी शासकीय वसतीगृहे 17
आश्रमशाळा 45
तंञ व्यवसाय शिक्षण
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था 4
अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था 7
पदविका अभ्यासक्रमाच्या तांञिक संस्था 3
 प्रवेश क्षमता 25
व्यवसाय प्रशिक्षण संस्था 37
(माध्यमिक उच्च माध्यमिक गट )
विद्यार्थी प्रवेश क्षमता 7000
नागरी पुरवठा
स्वस्त धान्य दुकाने 879
शासकीय गोदामे 17
उद्योग
नोंदणीकृत कारखाने 439
चालू कारखाने 295
सहकारी साखर कारखाने 4 फक्त् एक चालू
सूत गिरण्या दोन चालु
कारखान्यातील कामगार संख्या 7528
मध्यम उद्योग 38
लहान उद्योग 1504
दुग्धव्यवसाय
दूध शीतकरण केंद्र 6
सहकारी दुग्ध संस्था 559
सहकार
एकूण सहकारी संस्था 2948
संस्थेतील सभासद 768000
वाहतूक दळणवळण
रेल्वे मार्गाची लांबी 81.61 कि.मी.
राष्ट्रीय महामार्गाची लांबी 228 कि.मी.
प्रमुख राज्य मार्गाची लांबी  ---
राज्य महामार्गाची लांबी  669 कि.मी.
प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी 762 कि.मी.
इतर जिल्हा मार्गाची लांबी 920 कि.मी.
एकूण मार्गांची लांबी 5095 कि.मी.
दैनिके स्थानिक 8, विभागीय 6, साप्ताहिके 3

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

मराठी पत्रकारितेचे दीपस्तंभ : आचार्य बाळशास्त्री जांभेकर




     मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार बाळशास्त्री जाभेकरांचा 6 जानेवारी हा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो त्या निमित्ताने हा विशेष लेख . . . .
        आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अल्पावधीत महाराष्ट्र जीवनावर विलक्षण छाप टाकली आणि राष्ट्रीय विकासासाठी पोषक अशा बहुविध क्षितिजांचा विकास केला त्यामुळे त्यांना पश्चिम भारतामधील प्रबोधनाचे उद्गाते म्हटले जाते. मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी त्यांनी बजावलेले  कार्य हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविण्यासारखे आहे.
        मराठी पत्रकारितेचा पाया श्रेष्ठ दर्जाच्या संपादकाने घातला. त्यामुळे परंपरेचा सुवर्णप्रवाह विकसित झाला. प्रथम श्रेणीचे आद्य वृत्तपत्र म्हणून ¤ü¯ÖÔÖ पत्राची कामगिरी लक्षणीय अशी ठरली आहे.दर्पण हे वृत्तपत्र 1832 मध्ये काढुन मराठी वृत्तपत्रव्यवसायांचा  त्यांनी पाया घातला. दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक त्यांनीच 1840 मध्ये काढले .लोकशिक्षण ज्ञानप्रसार हाचा हेतू या उपक्रमांमागे होता.
        सुधारकांच्या पहिल्या पिढीने पाश्चात्य विद्या शिक्षण आत्मसात करुन नवी जीवनमूल्ये वृत्तपत्र माध्यमाव्दारे सजविली. त्या परंपरेचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला. बंगालात राजाराममोहन रॉय यांनी प्रयत्नशिल अशा सुधारणांचे नवयुग आरंभिले तेच कार्य बाळशास्त्री जांभेकरांनी दूरदृष्टीने बजावले.
        विलक्षण जीवन कहाणी - कोकणातील रत्नागिरी जिल्हयातील  देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी 1812 साली बाळशास्त्रींचा जन्म एका पुराणिकाच्या घरी झाला. पारंपारिक समाजात सुधारकाचा जन्म होतो. या सत्याची प्रचिती त्यांच्याही जीवनक्रमातून प्रकट होते. अज्ञान. दारिद्रय आणि रुढीप्रिय समाजाच्या अंध:कारातून बाहेर पडण्यासाठी सन 1825 साली ते मुंबईत आले. मुंबईत बापू छत्रे यांच्या निवासस्थानी राहून त्यांनी अध्ययनाचा शुभारंभ केला. आपल्या विलक्षण बुध्दीचातुर्याने तल्लख स्मरण शक्तीने त्यांनी त्या वेळच्या मुंबईतील सार्वजनिक जीवनावर विलक्षण छाप टाकली. सन 1830 मध्ये हिंद शाळा पुस्तक मंडळाचे  सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि एक नवे क्षितिज त्यांच्यासाठी खुले झाले. सन 1831 साली त्यांनी ग्रंथ रचनेस प्रारंभ केला. त्यानंतर वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण पत्राची मुहूत्रमेढ रोवली. मराठी पत्रकारितेच्या विचार विश्वात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरासारखी विलक्षण कामगिरी बजावणारे बाळशास्त्री जांभेकर हे त्यामुळे युगप्रवर्तक पत्रकार ठरले. सन 1834 साली भारतातील पहिले प्राघ्यापक ( ¯ÖÏÖê±êúÃÖ¸ü)  होण्याचा बहुमान त्यांना
                                                                                                    
मिळाला. एलफिस्टन निधीतून त्यांच्यासाठी स्वतंत्र अध्यासन निर्माण करण्यात आले. सन 1845 साली राज्यातील शिक्षण विभागाचे संचालक होण्याचा बहुमान  त्यांना मिळाला. प्राध्यापक या नात्याने अध्ययन, अध्यापन संशोधन विस्तार ही कार्ये पार पाडण्यात त्यांनी धन्यता मानली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात नवविचारांची लाट निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्नशिल वैचारिक चळवळ सुरु केली. समाज सुधारणा शिक्षणाची अभिवृध्दी तेच त्यांनी आपले जीवनकार्य मानले.
        अष्टपैलू व्यक्तीमत्व -  त्यांच्या समग्र जीवनाकडे पाहिले असता त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विलोभनीय दर्शन घडते. त्यांना देशी विदेशी 9 भाषा अवगत होत्या. मराठी, इंग्रजी, संस्कृत प्रमाणेच बंगाली, कन्नड इत्यादीप्रमाणे त्यांनी विदेशी भाषंाचाही अभ्यास केला होता. त्यांच्या अभ्यासविषयात भाषाशास्त्रे, इतिहास संस्कृती, गणित, पदार्थ विज्ञान, भूगर्भशास्त्र, पुरातत्वविधा इत्यादीचा समावेश होता. या सर्व विषयात त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचनाही केली. त्यांच्या कार्याबद्दल तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये प्रामुख्याने बॉम्बे टाईम्स, कुरियर, ज्ञानोदय, ओरिएंटल स्पेक्टेटर इत्यादी पत्रांनी वारंवार प्रशंसा केलेली आढळते त्यांच्या समाजकार्याची नोंदही घेतलेली दिसते. तत्कालीन शाळा खात्याने त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. मुंबई न्यायालयाचे त्यावेळचे न्या. सर टी. ई. पैरी यांनी त्यांचा गौरव केला होता. रे. डॉ. विल्सन, न्या. चंदावरकर या तत्कालीन विद्वानांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या लोकाभिमुख विव्दतेचा गौरव केला होता. भारतीय राष्ट्रवादाचे पितामह दादाभाई नौरोजी हे जांभेकरांचे विद्यार्थी होते. त्यांनी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करतांना म्हटले आहे, ते पश्चिम भारतखंडातील अर्वाचीन विव्दान मुकुटमणी, प्रख्यात पंडीत अव्दितीय विव्दान होते. ´ÖãÓ²Ö‡Ô­ÖÖ ÃÖ´ÖÖ“ÖÖ¸ü या गुजराथी पत्राने  या शिक्षण महर्षींची स्मृती  भारतीयांनी सतत जागृत ठेवावी असे आवाहन केले होते. 17 मे 1846 रोजी  जांभेकरांचा आकस्मित मृत्यू झाला. पण अल्पावधीत त्यांनी बजावलेले कार्य महाराष्ट्र जीवनाचा कायापालट करणारे ठरले.
        समाजसुधारक चळवळीचा आदर्श -  प्राध्यापक या नात्याने केवळ अध्यापन संशोधनात ते व्यग्र होते असे नाही तर त्यांनी राष्ट्रीय जीवनात अनेक प्रागतिक चळवळींना गती दिली. सामाजिक प्रबोधनासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे साधन नाही हे ओळखून त्यांनी बंगाली वृत्तपत्रापासून प्रेरणा घेतली ! 
        राजाराममोहन रॉय यांचे कार्य आणि बंगाली पत्रांनी केलेला झंझावाती प्रचार यामुळे भारुन जाऊन जांभेकरांनी नव्या पत्राचा संकल्प केला तो कृतीत आणला. ध्येयवादी बंगाली पत्राचा वस्तुपाठ जांभेकरांनी गिरविला त्यातून नवीन लोकचळवळ महाराष्ट्रात सुरु झाली. गंगा - जमनी व्दैभाषिक पत्र ही परंपरा बंगालातून महाराष्ट्रात पुढे आली. अशा या थोर आद्य पत्रकारास आपले लाख, लाख प्रणाम    
                                                                          
                                                                                                              जगन्नाथ पाटील