शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५

मुंढेगाव शासकीय आश्रमशाळेत ‘अन्नपूर्णा’ मध्यवर्ती स्वयंपाकगृहाचे उद्घाटन आदिवासी भागाच्या विकासासाठी सर्वांनी मिळून कार्य करावे-राज्यपाल




 नाशिक दि. 4 :- आदिवासी भागाच्या विकासासाठी सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून सर्वांनी मिळून कार्य करावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
राज्य शासन, टाटा ट्रस्ट आणि अक्षयपात्र फाऊंडेशनच्या वतीने आश्रमशाळेत मध्यवर्ती स्वयंपाकगृहाचा प्रयोग इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील शासकीय इंग्रजी माध्यमाच्या निवासी आश्रमशाळेत राबविण्यात आला आहे. त्या ‘अन्नपूर्णा’ मध्यवर्ती स्वयंपाकगृहाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल  बोलत होते. कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा, पालकमंत्री गिरीष महाजन, जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंभळे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार निर्मलाताई गावीत, आदिवासी विकास विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, आदिवासी विकास आयुक्त सोनाली पोंक्षे-वायंगणकर, टाटा ट्रस्टचे वेंकटरामन, अक्षयपात्रा फाऊंडेशनचे आर.मदन आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर म्हणाले की, आदिवासी युवकांमध्ये क्षमता आणि कष्ट करण्याची तयारी आहे. त्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यांना धनुर्विद्येचे प्रशिक्षण दिल्यास ते ऑलिम्पिकच्या सुवर्णपदकालाही गवसणी घालतील. त्याचप्रमाणे आदिवासींच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांना विज्ञान विषयाचे विशेष ज्ञान देण्याची गरज असून त्यासाठी  स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.
मध्यवर्ती स्वयंपाकगृहाच्या निर्मितीबद्दल समाधान व्यक्त करून राज्यपाल म्हणाले, अन्नाच्या गुणवत्तेत सातत्य राखण्यात यावे. मुलांना चांगले अन्न देऊन त्यांचे कुपोषण दूर करण्याचे प्रयत्न शासनस्तरावर करण्यात येत आहेत. राज्यात इतर ठिकाणीदेखील टाटा ट्रस्टने पुढाकार घेऊन आदिवासी मुलांना ताजे अन्न देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. शासन आदिवासी आश्रमशाळांमधील गळती रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करीत असून युवकांच्या कौशल्य विकासावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी देशभक्तांच्या यशोगाथांचा परिचय नव्या पिढीला करून द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.


मुंढेगाव येथे शासन आणि स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून  देशातील पहिले मध्यवर्ती स्वयंपाकगृह उभे करण्यात आल्याचे सांगून श्री.सवरा म्हणाले, आश्रमशाळामधील मुलांच्या भोजनाची समस्या सोडविण्यासाठी प्रायोगिक तत्वावर हे स्वयंपाकगृह उभारण्यात आले आहे. यामुळे खर्चातही बचत होणार असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यात इतरत्रही असे स्वयंपाकगृह उभारण्यात येईल.
शासनाने आदिवासी बांधवांच्या विकासासाठी विशेष योजना राबविल्या आहेत. पेसा अंतर्गत ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. 25 हजार विद्यार्थ्यांना नामांकीत शाळेत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा-वसतीगृह बांधकामाला चालना देण्यात येत आहे. कुपोषण नियंत्रणावर भर देण्यात येत असून मध्यवर्ती स्वयंपाकगृह त्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास  त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री श्री.महाजन म्हणाले, आदिवासी समाजाला शासनाच्या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सकस भोजनाच्या माध्यमातून सशक्त पिढी घडावी अशी कल्पना आहे. त्यासाठी स्वयंपाकगृह उपयुक्त ठरेल. आदिवासी मुलांनी क्षमतेच्या बळावर क्रीडा क्षेत्रात मिळविलेल्या यशाचा उल्लेख करून सामाजिक बांधीलकीतून आदिवासी बांधवांचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात श्री.देवरा यांनी स्वयंपाकगृह दोन महिन्यात उभारल्याचे सांगून टाटा ट्रस्टने यासाठी आर्थिक सहकार्य केल्याची माहिती दिली. इथे तयार होणाऱ्या भोजनामुळे मुलांवर होणारा परिणाम व या प्रकल्पाची उपयुक्त्ता विविध चाचण्यांच्या माध्यमातून अभ्यासण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
स्वयंपाकगृहात 20 हजार मुलांसाठी दिवसातून 60 हजार भोजन तयार करण्याची क्षमता आहे.  टप्प्याटप्प्याने शाळांची संख्या वाढवून अधिक मुलांना मध्यवर्ती स्वयंपाकगृहातील आहार उपलब्ध करून दिला जाणार आहे.  प्रारंभी राज्यपाल महोदयांनी स्वयंपाकगृहाची पाहणी केली. इथली स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
कुंभमेळ्यानिमित्त गोदावरी पुजन
राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी कुंभमेळ्यानिमित्ताने रामकुंड येथे सपत्नीक गोदावरी पुजन केले. यावेळी पालकमंत्री गिरीष महाजन उपस्थित होते. यावेळी श्री.राव यांनी गोदावरीच्या उगमाबद्दल पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांचेशी चर्चा केली.
*********


चित्रीकरणासाठी सात दिवसांत मिळणार सर्व परवानग्या सिनेमा-मालिकांच्या चित्रिकरणासाठी आता एक खिडकी योजना – सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे

मुंबई दि 3 : सिनेमा आणि मालिकांना चित्रीकरणापूर्वी देण्यात येणाऱ्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजना तयार करण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. या योजनेंतर्गत सिनेमा आणि मालिकांना चित्रीकरणापूर्वी कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 7 दिवसांच्या आत या सर्व परवानग्या दिल्या जाव्यात, अशी सूचनाही श्री. तावडे यांनी केल्या आहेत.
फिल्म इंडस्ट्री फेडरेशनच्या विविध मागण्यांसंदर्भातील बैठक आज सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सांस्कृतिक कार्य सचिव वल्सानायर-सिंह यांच्यासह फिल्म इंडस्ट्री फेडरेशनचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. तावडे यावेळी आपली भूमिका मांडताना म्हणाले की, सिनेमा आणि मालिका यांच्या चित्रीकरणासाठी विविध विभागांच्या अंदाजे 30 ते 32 परवानग्या घेणे आवश्यक असते. यासाठी निर्मात्यांना राज्य शासनाच्या विविध विभागांकडे पाठपुरावा करावा लागतो. यामध्ये अनावश्यक कालावधी खर्ची पडतो आणि निर्मात्यांना त्रासही होतो. त्यामुळेच निर्मात्यांना चित्रीकरणासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या एक खिडकी योजनेमार्फत देण्याचा सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रयत्न सुरु आहे. सदर एक खिडकी ही गोरेगाव येथील चित्रनगरी येथे सुरु करण्यात येईल आणि यामार्फत सर्व आवश्यक असणाऱ्या परवानग्या देण्याचे नियोजन केले जाईल, असेही श्री. तावडे यांनी या बैठकीत सांगितले.
करमणूक क्षेत्रामार्फत शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. त्यामुळे या क्षेत्राला उद्योग क्षेत्राचा दर्जा देणे, तसेच या क्षेत्रातील कलाकारांना पेन्शन, वैद्यकीय सुविधा देणे, या क्षेत्रातील लोकांना संरक्षण देणे याबाबतही राज्य शासन सकारात्मक आहे, असे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले. मालिकांची व्याप्ती लक्षात घेता या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी स्वतंत्र कायदा करता येईल का याबाबतही विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनीही 1984 साली बनविण्यात आलेला सिनेवर्कर्स अणि सिनेथिएटर्स ॲक्टचा अभ्यास करुन टीव्हीसाठी कायदा करावा, असे मत यावेळी व्यक्त केले.
श्री. तावडे यावेळी म्हणाले की, सिनेमा आणि चित्रपट क्षेत्रासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. जेणेकरुन यामुळे अनेक चांगले कलाकार घडतील आणि अनेक कुशल आणि प्रशिक्षित कामगार मिळण्यास मदत होईल. याशिवाय गोरेगाव येथील चित्रनगरी येथे स्वतंत्रपणे ॲडव्हायझरी बोर्ड स्थापन केला जाईल, ज्यामुळे तेथे येणाऱ्या अडचणी सोडविण्यास मदत होऊ शकेल, असेही तावडे यांनी सांगितले.

00000

पिण्याचे पाणी, जनावरांना चारा व मजुरांना वेळीच कामे उपलब्ध करून देणार ----- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


      परभणी, दि 03 : - मराठवाड्यात मागील काही वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाले असून यंदाही समाधानकारक पाऊस झालेला नाही. या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पिण्याचे पाणी,जनावरांसाठीचारा आणि मजूरांच्या हातालाकाम उपलब्ध करुन देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून यासाठी विविध उपाययोजनाही करण्यात येत आहेत. टंचाईस्थितीतशासन आणि प्रशासन शेतक-यांच्यापाठीशी खंबीरपणे उभे असून यापरिस्थितीमध्ये शेतक-यांनी खचून न जाता मनोबल भक्कम ठेऊन या परिस्थितीचा धीरानेमुकाबला करावा असे आवाहनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी मानवत तालुक्यातील ताडबोरगाव व पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे केले.
     यावेळी परिवहन तथा पालकमंत्री दिवाकर रावते, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकासमंत्री पंकजामुंडे, खासदार संजय जाधव, आमदार डाॅ राहुल पाटील, आमदार मोहन फड, आमदार बाबाजानी दुर्राणी, मुख्यमंत्र्यांचेप्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी, विभागीय आयुक्तउमाकांत दांगट, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी टी कदम, माजी आमदार मीराताई रेंगे, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीसम्हणाले, मराठवाडयातील टंचाई स्थितीची प्रत्यक्षशिवारात  पाहणी करुन शेतक-यांच्या, ग्रामस्थांच्यासमस्या जाणून घेण्यासाठीशासन आणि प्रशासन आपल्या दारीआले आहे. यंदाज्यांनी पेरणी केली त्यांचीपिके पावसाअभावी वाया गेली आणि ज्यांनी पावसाच्याप्रतिक्षेत तयारी केली पण पेरणी करु शकले नाहीत अशा  शेतक-यांचेही मोठे नुकसान झाले आहे. खरीपहंगाम जरी वाया गेला तरी रब्बीहंगामासाठी शासनाने बियाणेआणि खते यांच्या उपलब्धतेसाठीकाटेकोर नियोजन केले असून    शेतक-यांना या संकटातून सावरण्यासाठीवीज बिलात सुट देण्याचेही विचाराधीन असल्याचे श्री फडणवीस यांनी सांगितले. 
      पिण्याचेपाणी, जनावरांनाचारा आणि मजूरांच्या हातालाकाम देण्यासाठी आता सर्वतोपरीप्रयत्न करण्यात येत आहेत. शेतक-यांचे जनावरांवर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असते, जनावरांना जगविण्यासाठी आॅगस्ट महिन्यातच चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळत आहे. अल्पकाळात तयार होणारा हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. दहा टक्के रक्कम जनावरांच्या पाण्यासाठीराखीव ठेवण्यात आली आहे. तसेचचारा उपलब्ध नसल्यास परराज्यातूनहीचारा उपलब्ध करुन देण्यातयेईल.
      टंचाईस्थितीमध्ये मजूरांनाअत्यंत माफक दरामध्ये 15 ऑगस्टपासूनधान्य पुरवठा करण्यात येतअसून या योजनेचा लाभ 60 लाख गरजू कुटुंबाना होणार असून अशाप्रकारची योजना राबविणारेमहाराष्ट्र हे देशातील पहिलेराज्य असल्याचेहीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी यावेळी सांगितले.

ढालेगाव, ताडबोरगाव व पानेरा येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी साधला शेतक-यांशी संवाद

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथे गोदावरी नदी  तसेच बंधा-याची पाहणी केली.
  • मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे टंचाई निवारणार्थ करण्यात येत असलेल्या  विविध उपाययोजनांची तसेच शिवारातील पीकांच्या स्थितीची पाहणी केली.
  • परभणी तालुक्यातील पानेरा येथे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गतच्या सिमेंट नाला बांधाची पाहणी केली.
  • ढालेगाव, ताडबोरगाव व पानेरा गावांतील शेतकरी तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून शेतक-यांच्या अडीअडचणीही श्री फडणवीस यांनी जाणून घेतल्या.


            यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस के दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी आर टी सुखदेव, तहसिल, कृषी व संबंधीत विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.                               


माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने मंत्रालयात सोशल मीडिया कार्यशाळा संपन्न


मुंबई दि. 3 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आज मंत्रालयातील मिनी थिएटर येथे सोशल मीडिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दैनिक लोकसत्ताचे सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह प्रशांत ननावरे यांनी सोशल मीडियाशी संबंधित विविध विषयांवर उपस्थितांशी संवाद साधला.
          यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक, संचालक(प्रशासन) देवेंद्र भुजबळ, संचालक (वृत्त व जनसंपर्क) शिवाजी मानकर, उपसंचालक (प्रशासन) गणेश मुळे, उपसंचालक (वृत्त) ज्ञानेश्वर इगवे, वरिष्ठ सहायक संचालक (वृत्त) संभाजी खराट आदी उपस्थित होते.
          शासनाचे विविध कल्याणकारी निर्णय तसेच योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी  फेसबुक, ट्विटर यांसारखी माध्यमे अतिशय उपयुक्त आहेत. त्यांचा प्रभावी वापर कसा करावा, कोणती काळजी घ्यावी याबाबत श्री. ननावरे यांनी मार्गदर्शन केले.
प्रारंभी महासंचालक श्री. ओक यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. ननावरे यांचे स्वागत केले. सूत्रसंचालनसहायक संचालक ब्रिजकिशोर झंवर यांनी केले. कार्यशाळेसाठी महासंचालनालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

000000