बुधवार, ३ जून, २०१५

गोंदूर गावाच्या विकासासाठी परिपूर्ण विकास आराखडा तयार करावा -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 2 :-गोंदूर गावाच्या विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण विकास आराखडा तयार करून यंत्रणा प्रमुखांनी विकास कामांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी  केले.
            सांसद आदर्शग्राम जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, यशदाचे सोनार, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) बी. ए. बोटे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी एस. बी. तोरणे, गट विकास अधिकारी जी. ए. पाटील, जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती वैशाली हिंगे, सरपंच सखाराम पाटील, आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, यंत्रणांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण करून कामांना सुरूवात करावी.  आदर्श गाव म्हणजे त्या गावाचा परिपूर्ण विकास होईल अशा पध्दतीने केलेले काम होय.  गावांच्या मागणी प्रमाणे विकास आराखडा तयार करणे आवश्यक असून निधीच्या उपलब्धतेनुसार प्रत्येक प्रकल्प परिपूर्ण विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.  गोंदूर गावची ऑक्टोबर-2016 पर्यंत विकास कामे पूर्ण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
            यावेळी सांसद आदर्श ग्राम गोंदूर गावातील विकास आराखडयाचा आढावा घेण्यात आला.  त्यात नवीन प्रस्तावित करण्यात आल्यानुसार गावात सांडपाणी व्यवस्थापनासाठी पी.व्ही.सी. पाईप गटार करणे व सांडपाणी अंतिम व्यवस्था करणे, गावात घनकचरा व्यवस्थापनासाठी गावातील मुख्य चौकात कचरा कुंडया ठेवणे व कचरा गावाबाहेर टाकण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करणे, गावात संपूर्ण दारूबंदी करणे,  पिण्याच्या पाण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्र व पाईपलाईन करणे, गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण केल्याने गावात चिखल होणार नाही परिणामी स्वच्छता राखली जाईल व आरोग्याची समस्या भेडसावणार नाही  आणि वाहतूक सुखकर होईल, गाव शिवारातील रस्ते मुरमीकरण व खडीकरण करणे, संपूर्ण गाव खडकावर वसल्यामुळे वैयक्तिक शौचालयाला अडचण निर्माण होते.  त्यामुळे इतर कुटुंबासाठी सार्वजनिक शौचालय बांधल्याने गाव निर्मल होण्यास मदत होईल, गावाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग दिसून येत नाही.  महिलांचा सहभाग वाढल्याने गाव विकासाला चालना मिळेल, लोंढानाल्यावर सिमेंट  बांध बांधल्याने परिसरातील जमिन ओलिताखाली येण्यास मदत होईल व बागायती क्षेत्रात वाढ होईल, लोंढानाल्यावरील जुन्या सिमेंट नालाबांधाचा गाळ काढून खोलीकरण केल्याने पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल व शिवारातील विहीरींना त्याचा लाभ होईल, गावातील शिवारातील विजवाहक तारा जिर्ण झाल्यामुळे गावात व शिवारात विजेची समस्या निर्माण होते तारा बदलल्यामुळे शेतीला वीज पुरवठा होऊन शेती बागायतीला चालना मिळेल, ई-लर्निंगच्या माध्यमातून मुलांची शिक्षणाची आवड निर्माण होईल व अध्ययन ग्रहण क्षमतेत वाढ होईल परिणामी गुणवत्ता विकास साध्य होईल, गावातील स्त्री भ्रृण हत्येला प्रतिबंध केल्याने समाजातील मुलींचे प्रमाण वाढेल, युवकांना व्यायामाच्या सवयी निर्माण होऊन ते शारिरीकदृष्टया सक्षम होतील, गावात महिला व पुरूषांचे गट निर्माण केल्याने गावात संघटन व एकता निर्माण होईल, गावालगतच्या नाल्यामुळे गावात दुर्गंधी पसरते त्यामुळे नाला खोलीकरण करून बंदिस्त झाल्याने गावाच्या सांडपाण्याचा प्रश्न सुटेल व स्वच्छता राहील.

00000000 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा