शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५

तंटामुक्त गाव मोहीम बातमीदारांना पुरस्कार देण्यासाठी राज्यस्तरीय निवड समिती गठीत

 मुंबई,दि. 28 : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे  वस्तुनिष्ठ वार्तांकन करणाऱ्या बातमीदारांना गुणवत्तेनुसार (सन 2013-14) मधील पुरस्कार देण्यासाठी गृह  राज्यमंत्री (ग्रामीण) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवड समिती गठीत करण्यात आली आहे.
या मोहिमेची प्रभावी व यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यामध्ये पूरक व  प्रबोधनात्मक बातम्यांद्वारे प्रसिध्दी देण्याऱ्या वृत्तपत्रांच्या बातमीदारांना हा पुरस्कार देण्यात येणार असून जिल्हास्तर, विभागीयस्तर व राज्यस्तरावर प्रत्येकी तीन (3) पुरस्कार देण्यात येणार आहेत.
या राज्यस्तरीय निवड समितीतील सदस्य पुढीलप्रमाणे आहेत. अपर मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई,प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालकमराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी किरण नाईक, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष चंदन शिरवाळे, दैनिक लोकसत्ताचे प्रतिनिधी संजय बापटदैनिक हिंदुस्थानचे प्रतिनिधी सर्फराज आरजू, तसेच  टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाचे प्रतिनिधी संजीव शिवडेकरतर उपसचिवगृह विभाग (कार्यासन,पोल-15) हे समितीचे सदस्य सचिव आहेत.
००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा