मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०१५

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत राज्यात कामे सुरु

मुंबई, दि. 27 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत राज्यात चालू आठवडयात एकूण 13 हजार 737 कामे चालू असून त्यावरती 1 लाख 2 हजार 15 इतकी मजूर उपस्थिती आहे.
            10 ऑक्टोबर 2015 रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये मागील आठवड्यापेक्षा मजूर उपस्थितीत घट झाली आहे. सर्वात जास्त घट बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये झाली असून परभणी, धुळे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे.
            राज्यामध्ये एकूण 4 लाख 12 हजार 633 इतकी कामे शेल्फवर ठेवण्यात आली आहेत. यामध्ये मजूर क्षमता 1,305.56 लाख इतकी आहे. एकूण शेल्फवरील कामांपैकी 3 लाख 5 हजार 955 कामे ग्रामपंचायतीकडे आणि उर्वरित 1 लाख 6 हजार 678 कामे यंत्रणेकडे आहेत.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा