शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१२

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या भाविकांनी वनसंपत्तीचा ऱ्हास टाळावा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या भाविकांनी वनसंपत्तीचा ऱ्हास टाळावा


मुंबई, दि. 17 :  महाशिवरात्री निमित्त कान्हेरी गुंफा व तुंगारेश्वर मंदीरास भेट देणाऱ्या भाविकांना20 फेब्रुवारी 2012 रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व तुंगारेश्वर मुख्य प्रवेश द्वारा व्यतिरिक्त इतर रस्त्याने प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. सकाळी 7.30 ते संध्याकाळी 4.30 पर्यंत प्रवेश देण्यात येणार असून त्यानंतर अथवा त्यापूर्वी प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक भाविकाने उद्यानात व अभयारण्यात प्रवेश करताना प्रवेश फी भरणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उद्यानाच्या संरक्षणाच्या दृष्टीने सहकार्य करावे. बिबट्यांचा उद्यान परिसरात संचार असल्याने भाविकांनी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत उद्यानाच्या बाहेर जावे, असे आवाहन मुख्य वनसंरक्षक व संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांनी केले आहे.
          भाविकांनी प्लास्टीक पिशव्या, थर्माकॉल कप, आगपेटी, लाईटर, सिगारेट, विडी, रॉकेल, ज्वलनशील पदार्थ सोबत आणू नयेत. पिण्याचे पाणी काचेच्या अथवा स्टीलच्या बाटलीत तसेच इतर खाद्यपदार्थ कागदी अथवा कापडी पिशवीत आणावेत. उद्यानात अथवा अभयारण्यात संगीत साधने, म्युझिक सिस्टीम, रेडिओ आदी आणण्यास मनाई करण्यात आली आहे. हातगाडीवाले, टॅक्सी, कार, खासगी बस यांना वाहतुकीस मनाई करण्यात आली असून खाद्यपदार्थ, पेय याची विक्री करणाऱ्या व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा