शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१२

रत्नागिरीच्या समर्थ नर्सिंग महाविद्यालयास एम.एस.सी. (नर्सिंग) अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता


मुंबई, दि. 17 :  रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटीज्  ट्रस्टच्या समर्थ नर्सिंग महाविद्यालयास 2011 -12 या शैक्षणिक वर्षाकरिता मेडीकल सर्जिकल नर्सिंग व ऑब्सेट्रीक ॲण्ड गायनॉकालॉजीकल नर्सिंग या दोन  विषयात एम.एस.सी. (नर्सिंग) प्रत्येकी चार विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यास शासनाने पुढील अटी व शर्तींच्या अधीन राहून मान्यता दिली आहे.
अटी व शर्ती-
        या महाविद्यालयातील मेडीकल सर्जिकल नर्सिंग व ऑब्सेट्रीक ॲण्ड गायनॉकालॉजीकल नर्सिंग या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता केंद्र शासनाने निर्धारित केल्यानुसार प्रत्येकी  4 एवढी राहील.
केंद्र शासन, राज्य शासन, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेली कार्यपध्दत अवलंबिण्यात यावी.
सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयानुसार शैक्षणिक शुल्कासाठी कार्यपध्दत अनुसरणे भाग आहे. त्यानुसार शैक्षणिक शुल्क निश्चित करण्यात यावे.  
केंद्र शासन, केंद्रीय परिचर्या परिषद, नवी दिल्ली व राज्य शासन यांनी नर्सिंग अभ्यासक्रमाबाबत विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक आहे.
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध) अधिनियम 1987 मधील तरतुदींचे संस्थेने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
या संस्थेस कायम  विनाअनुदान तत्वावर मान्यता देण्यात आली आहे.  त्यामुळे संस्था आवर्ती किंवा अनावर्ती स्वरुपाच्या खर्चासाठी अनुदानाची मागणी शासनाकडे करणार नाही.
शासकीय नर्सिंग तत्सम महाविद्यालयातील कोणत्याही अध्यापकास तो सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होईपर्यंत या संस्थेमध्ये नोकरी करता येणार नाही. त्यांच्या सेवा या संस्थेस वापरता  येणार नाही.
संस्थेने कोणत्याही परिस्थितीत शासनाने मान्य केलेल्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेश देऊ नयेत. केंद्र शासनाने दिलेली परवानगी 2011-12 या वर्षासाठी असल्याने पुढील वर्षाचे प्रवेश करण्यापूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या परवानगीचे नुतनीकरण करुन घेणे संस्थेस बंधनकारक आहे.
 केंद्रीय परिचर्या परिषदेने दिलेली परवानगी सन 2011-12 या एका वर्षासाठी आहे. पुढील वर्षाचे विद्यार्थी प्रवेश करण्यापूर्वी केंद्रीय परिचर्या परिषदेची तसेच त्या आधारे राज्य शासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
संस्थेने गुणवत्तेवर आधारीत प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या प्रवेश नियंत्रण समिती, मुंबई यांच्याकडून मंजूर करुन घेणे व आकारण्यात येणाऱ्या फी शुल्काची निश्चिती शिक्षण शुल्क समितीकडून करुन घेणे आवश्यक आहे.
0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा