शनिवार, ३१ मार्च, २०१२

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात 2 एप्रिल 2012 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


          मुंबई, दि.30 : नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा जलदगतीने व्हावा, त्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी यांचे कार्यालय पहिला मजला, ओल्ड कस्टम हाऊस,शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई, येथे सोमवार दिनांक 2 एप्रिल 2012 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी, नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
          मुंबई शहर जिल्ह्याच्या शासकीय, निम शासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारी संबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत, त्यांनी सदर दिवशी उपस्थित राहून तीन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठविलेली निवेदने लोकशाही दिनी स्वीकारली जाणार नाहीत. तसेच तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येऊ नये. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. सेवा व आस्थापना विषयक तक्रारी, विविध न्यायालये, प्राधिकरण, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी (उदा.राजस्व, अपिल्स इ.) स्वीकारल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी कळविले आहे.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा