सोमवार, ४ जून, २०१२

मुंबई दि. 2: भारतीय प्रशासन सेवेतील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने आज हे आदेश निर्गमित करण्यात आले.
यवतमाळचे जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती प्रकल्प, नवी मुंबई येथे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धीरज कुमार यांची बदली जिल्हाधिकारी नांदेड (पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून) येथे करण्यात आली आहे.
सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन मुद्गल यांची बदली जिल्हाधिकारी यवतमाळ म्हणून तर जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निरूपमा डांगे यांची बदली सह विक्रीकर आयुक्त, औरंगाबाद (पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून) या पदावर करण्यात आली आहे.
चंद्रपूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी शितल उगले यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव (पद कनिष्ठ समय श्रेणीत अवनत करून) येथे करण्यात आली आहे.
. . .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा