बुधवार, ४ एप्रिल, २०१२

यशवंतराव चव्हाण यांचे कार्य महाराष्ट्रासाठी दिशादर्शक - मुख्यमंत्री


मुंबई, दि. 3 : स्व. यशवंतराव चव्हाण यांचे कार्य हे द्याच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी दिशादर्शक ठरणारे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
            महाराष्ट्र विधानमंडळ आणि राष्ट्रकु संसदीय मंडळ यांच्यावतीने येथील मध्यवर्ती सभागृहात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे लिखित, 'महाराष्ट्र काल, आज आणि उद्या' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
            व्यासपीठावर विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष दिलीप   वळसे -पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, संसदी कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, प्रा. अरुण गुजराथी, आमदार हेमंत टकले, प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून स्व. यशवंतराव चव्हाण यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असताना संरक्षण, गृह, परराष्ट्र वित्त या महत्त्वाच्या चारही खात्यांचे मंत्रीपद भूषविणारे ते एकमेव मंत्री होते. त्यांच्या विचारांची स्फुर्ती घेऊन द्याच्या महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट तयार करण्याची आवश्यकता असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
            विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार होते. मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी विकासाचा चौफेर आराखडा तयार करुन कृतीशिलतेला प्राधान्य दिले. त्यांच्या जीवनावर संशोधनपर लिखाण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
            'यशवंतराव महाराष्ट्रातले, यशवंतराव दिल्लीतले ' या विषयावरील आपल्या भाषणात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक साहित्यिक क्षेत्रातील कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, साहित्य क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. कृष्णाकाठ, सह्याद्रीचे वारे, ऋणानुबंध या महत्त्वाच्या ग्रंथलिखाणाबरोबरच 22 पुस्तकांची प्रस्तावना त्यांनी लिहीली. सात  साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद पाच साहित्य संमेलनांचे स्वागताध्यक्ष पदही त्यांनी भूषविले. यशवंतराव चव्हाण यांची शेतकऱ्यांविषयीची आस्था, त्यांची शिक्षणाबद्दलची तळमळ आदी गोष्टींचीही मधुकर भावे यांनी माहिती दिली.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार उल्हास पवार यांनी समारोपाचे भाषण आमदार हेमंत टकले यांनी केले.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा