बुधवार, ४ एप्रिल, २०१२

लावणी महोत्सवाच्या माध्यमातून लोककलेला राजाश्रय मिळवून देण्याचा प्रयत्न - संजय देवतळे


मुंबई, दि. 3 : महाराष्ट्राची लोककला सर्वत्र पोहोचावी, कलावंतांना प्रोत्साहन व्यासपीठ मिळावे, आणि लोककलेला राजाश्रय मिळावा या उद्देशाने लावणी महोत्सवाचे आयोजन राज्य शासन री असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे यांनी येथे सांगितले.
          राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे एनसीपीएच्या टाटा नाटयगृहात आयोजित केलेल्य तीन दिवसीय लावणी महोत्सवाच्या द्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, ग्रामविकासमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील, उच्च तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री सुनी तटकरे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आशुतोष घोरपडे, आमदार श्रीमती ॲनी शेखर, विक्रम काळे, सुभाष झनक आदी उपस्थित होते.
          यावेळी ज्येष्ठ लोककलावंत सरलाबाई नांदुरेकर, कांताबाई बेलोरेकर, शकुंतलाताई नगरकर, मंगला कुडारकर यांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. निवड समितीच्या सदस्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
          पहिल्या दिवशी वैशाली नगरकर, वैशाली सुवर्णा कोल्हापूरकर, जय अंबिका कलाकेंद्र सणसवाडी यांनी लावणी सादर केली. 'मी निघाले निघाले बाजाराला, 'भर बाजारी जाता जाता, अशा एका पेक्षा एक  लावणी यावेळी सादर करून रसिकांची मने जिंकली. उद्या 4 एप्रिल रोजी अंबिका संजिवनी लखनगावकर, राणी सीमा खांडवीकर, सणसवाडी, आर्यभूषण थिएटर्स, पुणे हे कला पथक आपली कला सादर करणार आहेत.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा