मंगळवार, १४ जुलै, २०१५

पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत शासन सकारात्मक -मुख्यमंत्री

मुंबई दि. 13 : पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत शासन सकारात्मक असून,याबाबत  पत्रकारांशी चर्चा करुन प्रयत्न केले जातीलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मंत्रालयातील नवीन पत्रकार कक्षाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय तसेच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांनी संयुक्तरित्या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरतर प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेविधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक उपस्थित होते.
श्री. फडणवीस पुढे म्हणाले कीपत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करीत आहे. चांगले काम करणाऱ्या पत्रकाराला संरक्षण मिळाले पाहिजे परंतु पत्रकारितेच्या नावाखाली गैरप्रकार घडू नयेतयाचीही दक्षता घेतली पाहिजे. या दृष्टीने कायदा करण्याबाबत  पत्रकारांशी चर्चा करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिली. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेचं स्थान महत्त्वाचे आहे. देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पत्रकारिता अधिक समृद्ध आहे. समृद्धतेची  ही परंपरा कायम ठेवत सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी शासनासोबत पत्रकारांनीही आपली जबाबदारी पार पाडावी असेही श्री. फडणवीस म्हणाले.
पत्रकारांना निवृत्तीवेतन तसेच घरे देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यादृष्टीने अधिक गतीने कार्यवाही केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील पत्रकारांच्या पेन्शनघरांच्या प्रश्नांबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा व्हावा अशी अपेक्षा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.
आजच्या काळात बातमीचे मूल्य बदलत आहे. पत्रकारितेतून शेती आणि समाजाचे प्रश्न ठळकपणे मांडले जावेत अशी अपेक्षा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केली.
मंत्रालयाला लागलेल्या आगीत पत्रकारकक्षाचे नुकसान झाले होते. आज नवीन पत्रकार कक्षाचे उद्घाटन होत असताना आनंद होत आहे असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. विखे-पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष चंदन शिरवाळे यांनी केले. तर आभारप्रदर्शन उपाध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी केले. सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वरिष्ठ सहाय्यक संचालक मीनल जोगळेकर यांनी केले. कार्यक्रमासाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पदाधिकारी व सदस्य पत्रकारमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

००००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा