शुक्रवार, १० जुलै, २०१५

बागाईतदार शेतक-यांनी पाणी अर्ज 31 ऑगस्ट पूर्वी सादर करावेत

       धुळे, दि. 10 :- धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या अधिपत्याखालील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, बंधारे, अधिसूचित नदी, नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजना यांचा पाण्याचा फायदा घेणा-या तमाम बागाईतदारांनी दि. 1 जुलै, 2015 ते 14 ऑक्टोबर, 2015 या कालावधीसाठी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात दि. 31 ऑगस्ट, 2015 पर्यंत सायंकाळी 5-45 वाजेपर्यंत सादर करावे, असे आवाहन धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
         दि. 1 जुलै, 2015 पासून सुरु झालेला खरीप हंगाम 2015-16 मध्ये भुसार, अन्नधान्ये, चारा, डाळी, कपाशी, भुईमुग व इतर हंगामी पीके आदी पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी अर्ज सादर करण्यासाठी मंजुरी देण्यात येणार आहे.  पाणी अर्ज स्वीकारण्याच्या अटी व शर्ती नियमानुसार राहतील, असेही पत्रकात नमूद केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा