शुक्रवार, १० जुलै, २०१५

वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण




 मुंबईदि. 10 : वसंतराव नाईक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे आज वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले.
          वसंतराव  नाईक कृषी पुरस्कार 2015 चे मानकरी :
          ग्रामविकास समिती अध्यक्ष चैत्राम पवार  यांना वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार देण्यात आला. 51 हजार रूपयेशालश्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे कुलगुरू डॉ.बी.वेंकटेश्वरलू यांना कृषी पुरस्कार,तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांना फलोत्पादन पुरस्कारसोमनाथ आंबेकर यांना भाजीपाला उत्पादन पुरस्कारदामोदर माळी यांना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय पुरस्काररघुनाथ पाडवी यांना कृषी प्रक्रिया उद्योग पुरस्कारप्रकाश शहा यांना वनशेती पुरस्कारमाधव गो.कोटस्थाने यांना जलसंधारण पुरस्कारडॉ. टी. एस. मोटे यांना कृषी साहित्य पुरस्कारडॉ. नागेश शंकरराव टेकाळे यांना कृषी पत्रकारिता पुरस्कारराजेंद्र दत्तात्रेय बोरस्ते यांना कृषी उत्पादन निर्यात पुरस्कार आणि सुभाष भट्टे यांना फुलशेती उत्पादन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 21 हजार रूपयेशालश्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
          यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीकै. वसंतराव नाईक यांनी आपल्या 11 वर्षाच्या कारकिर्दीत केलेली कामगिरी ऐतिहासिक व पथदर्शी आहे. जोपर्यंत शेतकरीसामान्य माणूस विकासाच्या धारेत येत नाहीतोपर्यंत विकास होणे शक्य नाही. हे ओळखून कै.वसंतराव नाईक यांनी 1972 च्या दुष्काळात मूलभूत कामे केली होती. त्यांनी हरितक्रांती आणून ती सामान्य शेतकऱ्यांच्या शेतीत पोहचविली. त्याचबरोबर जलसंधारणमृदसंधारण या मूलभूत प्रश्नांवरही त्यांनी काम केले आहेअसे ते यावेळी म्हणाले.
          आपण जोपर्यंत गावे स्वयंपूर्ण करणार नाही तोपर्यंत शाश्वत शेती करणे शक्य होणार नाही. त्यासाठी जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याच्या विकेंद्रीत साठ्याचे काम करणे आवश्यक आहे. यासाठी राज्याने जलशिवार योजनांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

          विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले कीसन 1963-64 पूर्वी राज्य अन्नधान्याने स्वयंपूर्ण नव्हते. यावेळी कै.वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्र राज्य अन्नधान्याने स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार केला. सन 1972 च्या दुष्काळात कै.वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजना सुरू करून लोकांना काम देण्याचे काम केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गावाला जोडणारे रस्ते निर्माण झाले असल्याचेही ते म्हणाले.
          सध्या शेतकऱ्यांच्या विहीरी कोरड्या पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात पडलेले पावसाचे पाणी गोळा करून ते विहिरीत किंवा खड्डा करून साठवणे आवश्यक आहे. यामुळे 100 टक्के शेती करता येणे शक्य होईल. शेतकऱ्यांनी ठिंबक सिंचनाद्वारे शेती करण्याची आवश्यकता असल्याचेही श्री.बागडे यांनी सांगितले.
          यावेळी श्री. बागडे यांच्या हस्ते वसंतराव नाईक कृषी पुरस्कार स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
          या वितरण पुरस्कारास वसंतराव नाईक संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.बी.आर.बारवालेकार्याध्यक्ष अविनाश नाईकसचिव ॲड.  विनयकुमार पटवर्धनमाजी मंत्री व सदस्य मनोहर नाईकपुरस्कारार्थी आणि त्यांचे कुटुंबियउपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.बी.आर.बारवाले यांनी केले तर विश्वस्त दिपक पाटील यांनी आभार मानले.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा