गुरुवार, १९ नोव्हेंबर, २०१५

राज्यात साडेसात कोटीहून अधिक नागरिकांना तीन रुपये दराने तांदूळ पुरेसा साठा आणि मोठ्या खरेदीमुळे तांदळाचे भाव नियंत्रणात : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 18 : राज्यात तांदळाचा पुरेसा साठा उपलब्ध असून मोठी आवक आणि शासनाकडून झालेली चांगली खरेदी यासोबत तांदळाचा पुरेसा साठाही उपलब्ध आहे. तसेच राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना शासनाकडून प्रतिकिलो तीन रुपये या सवलतीच्या दरात तांदळाचे वाटप केले जात आहे. या सर्व प्रक्रियेमुळे तांदळाचे भाव नियंत्रणात राहणार असून जनतेने काळजी करण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.  
याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, 2013 ची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये 1 फेब्रुवारी 2014 पासून सुरु करण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभ घेत असलेल्या सुमारे 8 कोटी 77 लाख 19 हजार लाभार्थ्यांपैकी अंत्योदय अन्न योजनेतील व बीपीएलमधील सर्व तसेच एपीएल (केशरी) मधील काही अशा एकूण 7 कोटी 17 हजार लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमानुसार अन्नधान्याचा लाभ मिळत आहे. अंत्योदय अन्न योजनेमधील लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका दरमहा 35 किलो व प्राधान्य कुटुंबातील प्रतिव्यक्ती दरमहा 5 किलो याप्रमाणे अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत असून या सर्व लाभार्थ्यांना तीन रुपये प्रतिकिलो या दराने तांदळाचे वाटप केले जात आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील 7 कोटी 17 हजार लाभार्थ्यांना दरमहा 1 लाख 68 हजार 425 मे. टन तांदळाचे वाटप केले जात आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट न झालेल्या राज्यातील सुमारे 1 कोटी 77 लाख लाभार्थ्यांपैकी औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व म्हणजे 13 जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा अशा शेतकरी आत्महत्त्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील सुमारे 68 लाख शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेप्रमाणे प्रतिव्यक्ती दरमहा 5 किलो या परिमाणात तीन रुपये प्रतिकिलो या दराने तांदळाचे वाटप करण्यात येत आहे. या लाभार्थ्यांना दरमहा 13 हजार 600 मे. टन तांदळाचे वाटप केले जात आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थी (7 कोटी 17 हजार) व शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांतील शेतकरी (68 लाख) यांच्या एकत्रित आकडेवारीनुसार राज्यातील एकूण 7 कोटी 68 लाख 17 हजार नागरिकांना एकूण 1 लाख 82 हजार 25 मे. टन तांदळाचे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील  सुमारे 52 हजाररास्तभावदुकानांमधूनतीनरुपयेप्रतिकिलोयादरानेदरमहानियमितपणेवाटपकरण्यातयेतआहे. त्यामुळेराज्यातीलजास्तीतजास्तसामान्यनागरिकांनासवलतीच्यादरानेशासनाकडूनतांदळाचेवाटपकेलेजातअसल्याचेस्पष्टहोते. तसेचराज्यातपुरेसासाठाही उपलब्ध आहे. याशिवाय तांदळाची मोठी आवक होत असून खरेदीही भरपूर प्रमाणात झाली आहे. त्यामुळे तांदळाचे भाव वाढणार असल्याबाबतचे वृत्त निराधार असून सर्वसामान्य जनतेने काळजी करण्याचे कुठलेही कारण नाही, असेही या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा