गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१२

बालकामगार प्रथा निर्मूलनासाठी लोकसहभाग आवश्यक


बालकामगार प्रथा समाजाला लागलेला कलंक आहे. त्यांना शिक्षण देणे ही सामाजिक गरज आहे. रिबीमुळे शाळा शिकणारी मुले/मुली कामधंदा करुन अर्थाजन करतात. अशी मुल म्हणजेच बालकामगार होय. बालवयात त्यांना धोकादायक उद्योग व्यवसायात कामावर ठेवता त्यांची शारीरि मानसिक वाढ होऊन त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बालकामगार प्रथेचे संपूर्णपणे निर्मूलन होणे गरजेचे आहे. यासाठी बालकामगारांना शिक्षण देणे हाच पर्याय आहे.
बालकामगार निर्माण होण्यास आई वडिलांचे अडाणीपण, अज्ञान, अशिक्षितपणा, व्यसन, दारिद्र्य आदी बाबी कारणीभूत असतात. घरात खाणारी वाढती तोंडे पालकांच्या व्यसनामुळे स्वत: मुलांना घर चालविण्यासाठी अर्थाजन करावे लागते. काही मुले घरी चालू असलेले काम म्हणजेच लोहारकाम, सोनारकाम, शेती, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन अशी पारंपरि कामे करतात. गाढवावरुन माती वाहून नेणे, विडीकाम, वस्त्रोद्योग, घरकाम, विटभट्टीवर, बांधकाम, हॉटेल, कचर/भंगार वेचणे अश अनेक धोकादायक उद्योगात ही मुले काम करतात. काही मुलं कारखान्यात काम करतात. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे.
शिक्षणासाठी येणारा खर्च पालकांना परवडणारा नसतो. रोजची कमाई घरखर्चावर तसेच व्यसनावर खर्च होत. अनेक मुले कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून निरनिराळ्या वस्तू पुनर्प्रक्रियेसाठी गोळा करतात. सतत घाणीत काम करुन त्यांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.
समाजामध्ये बालमजूर हा अत्यंत उपेक्षित घटक आहे. ज्या वयात खेळायचे, बागडायचे, शिक्षण घ्यायचे त्या वयात या मुलामुलींना धोकादायक उद्योगात काम करावे लागते. यामुळे लाखो मुलांचे जीवन कोमेजून जात आहे. ज्या उद्योग, व्यवसायामध्ये बालमजरांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणच्या बालकामगारांना कामापासून परावृत्त करुन त्यांचे योग्य पध्दतीने शैक्षणिक पुनर्वसन घडवून आणण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशिल आहे.
बालकामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनामार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. बालकामगारासाठी विशेष शाळा चालविल्या जात आहेत. बालकामगारांच्या पुनर्वसनाचे कार्य वेगात सुरु आहे.  त्यांना  शासनाकडून  शैक्षणिक व्यवसाय प्रशिक्षण, साहित्य, गणवेश, विद्यावेतन, मध्यान्ह भोजन पुरविण्यात येते. बालकामगारांना शाळेच विशेष  गोडी लागावी यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मुलांनी एका ठिकाणी बसावे, अंकांची, अक्षरांची ओळख व्हावी यासाठी आनंददायी वातावरण निर्मिती विशेष शाळेतील कर्मचारी करतात. मुलांच्या कलाने शिकवितात. गाणी, गोष्टी, देशभक्तीपर गीते, परिसरातील माहिती दिली जाते. विविध सण दिनविशेष शाळेत साजरे केले जातात. त्यांचे हरविलेले बालपण मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत.
 धोकादायक उद्योग/व्यवसायात काम करणाऱ्या बालकामगारांना या विशेष शाळेत प्रवेश देण्यात येतो. यासाठी शासनामार्फत बालकामगारांच सर्वेक्षण करण्यात येत. बालकामगार शिक्षणापासून वंचित असतात. त्यांच्या घरी परिसरामध्ये शिक्षणाचे, स्वच्छतेचे वातावरण नसते. त्यामुळे त्यांच्यावर याबाबतीतील संस्कार करुन, शिकण्याची गोडी लावून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.
बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत केली तर बालकामगार प्रथा समूळ नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आजची ही लहान मुले द्याच्या भारताचे भविष्य आहे. ज्‍ज्वल भारताच्या भविष्यासाठी या मुलांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी हवी सर्वांची साथ. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा