सोमवार, ५ मार्च, २०१२

डबल डेकर लोकल सुरु कराव्यात नसीम खान यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी


            
            मुंबई, दि. 3 : मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात ने आण करुन उपनगरीय रेल्वे एक महान कार्य करीत आहे. या सेवेवरील दिवसेंदिवस वाढणारा ताण लक्षात घेता मुंबईत डबल डेकर लोकल सुरु कराव्यात तसेच यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी जास्तीत जास्त निधी देण्यात यावा, अशी मागणी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ़मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
            दररोज सुमारे 72 लाख प्रवाशांची ने आण करणाऱ्या मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या सेवेमध्ये दर्जेदार सुधारणा होण्यासाठी तसेच लोकलचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी केंद्रीय रेल्व मंत्री दिनेश त्रिवेदी यांना लिहिलेल्या पत्रात श्री.खान यांनी 13 मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये बऱ्याच रेल्वे स्थानकांवर फलाट आणि रेल्वेच्या डेकमधील अंतर अत्यंत जास्त  असते  त्यामुळे लहान मुले, महिला, अपंग आणि वृध्दांना चढ-ऊतार करताना त्रास होतो. यामुळे बऱ्याच वेळी अपघातही होतात, हे अंतर कमी आणि सुलभ करण्यात यावे, महिलांच्या डब्यांमध्ये रात्री 9 ते सकाळी 7 पर्यंत सुरक्षा पुरविण्यात यावी, विविध नागरी सुविधांसह सर्व रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, रेल्वे फलाटांवर स्त्री आणि पुरुषांना (विशेषत: स्त्रियांना) स्वच्छ आणि व्हेंटीलेटेड स्वच्छतागृहे बांधावीत तसेच फलाटांवरील स्टॉल्सवर स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण असावे. अन्नपदार्थांचा दर्जा उत्तम असावा, फलाटांवर सिसिटिव्ही कॅमेऱ्यांसारख्या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असाव्यात,  स्वच्छतागृहे, जिन्याखालील मोकऴ्या जागांमध्ये चालणाऱ्या गैरकृत्यांवर आळा घालावा.
रेल्वेच्या टपावर बसून प्रवास करणाऱ्या प्रकाराला पूर्ण आळा घालावा, हेल्पलाईन यंत्रणा कायम कार्यान्वित असावी, प्रत्येक फलाटावर पोलीस उपलब्ध असावेत, बऱ्याच वेळा मलेरियासारख्या साथीच्या रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या रेल्वे ट्रॅकच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, रेल्वे ट्रॅकवर येणारे सांडपाणी किंवा रेल्वे मार्गावर येणाऱ्या गटारी नाले आदींबाबत महापालिकेशी समन्वय साधून हे प्रश्न निकाली काढावेत, रेल्वे ट्रॅकवर दरवर्षी साडेतीन हजारापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात. ही बाब गंभीर असून याबाबत सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात.
            फैजाबादला सध्या आठवड्यात एकदा जाणारी साकेत एक्सप्रेस दर दिवशी सोडण्यात यावी तसेच ही एक्सप्रेस 3 दिवस सध्याच्याच सुलतानपूर मार्गे सोडण्यात यावी तर 4 दिवस शहागंज-आयोध्यामार्गे सोडण्यात यावी. यामुळे मुंबईतून आयोध्येला जाणाऱ्या यात्रेकरुंची सोय होईल. 
            रेल्वे स्थानके चहुबाजूंनी कायमच खुली असतात, त्यामुळे ही स्थानके अतिरेक्यांचे सॉफ्ट टार्गेट ठरत आहेत. त्यामुळे सर्वच स्थानकांवर कडक सुरक्षा व्यवस्था करणे गरजेचे आहे, असेही श्री. खान यांनी या पत्रात म्हटले आहे.
000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा