सोमवार, ५ मार्च, २०१२

नागपूर इन्फोसिसमधून येत्या दहा वर्षात 14 हजार अभियंत्यांना रोजगार .. मुख्यमंत्री सामजंस्य करारामुळे मिहानला गती


नागपूर,दिनांक 04:  येत्या दहा वर्षात 14 हजार सॉफ्टवेअर अभियंत्यांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या इन्फोसिस कंपनी सोबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा आज मिहान विशेष आर्थिक झोन मधील केंद्रीय सुविधा इमारतीच्या सभागृहात सामंजस्य करार झाला. या ऐतिहासिक समारंभास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री  मुकूल वासनिक उपस्थित होते.            
             एम.एडी.सी.चे उपाध्यक्ष यू.पी.एस. मदान, आणि इन्फोसिस कंपनीचे  व्यवस्थापकीय संचालक  व मुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी.  शिबुलाल यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या.
            मिहान परिसरात इन्फोसिस कंपनीस 142 एकर जागा देण्यात आली आहे. येत्या तीन वर्षात कंपनीचे प्राथमिक काम पूर्ण करण्यात येईल. पहिल्या पाच वर्षात 100 कोटी रूपयांची गुंतवणूक करून दोन हजार सॉफ्टवेअर अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
            इन्फोसिस कंपनीचे नागपुरातील केंद्र महाराष्ट्रातील दुसरे केंद्र असून देशातील  बारावे विकास केंद्र आहे. पुणे हे राज्यातील इन्फोसिस कंपनीचे न पहिले केंद्र आहे. पुण्यात 28 हजार लोकांना प्रत्यक्ष तर 75000 लोकांना अप्रत्यक्षपणे  इन्फोसिस कंपनीत रोजगार मिळाला आहे.
                                                मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
            या सामंजस्य करार समारंभात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,  मिहानच्या स्वप्नपूर्तीचे इन्फोसिस कंपनी ही एक नवे पाऊल आहे.  " एव्हिएशन हब " निर्माण करण्याचे वेगाने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात नागपुरात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्माण होऊन येथील विशेष आर्थिक क्षेत्राचा झपाट्याने विकास होण्यास मदतच होणार आहे.
            विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीबदल बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, या धावपट्टीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. भूसंपादन व पुनर्वसन या दोन्ही प्रक्रिया सोबत चालवायच्या असल्यामुळे ही सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील. धावपट्टी निर्मितीसाठी कंत्राट देण्याची प्रक्रिया सुध्दा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी  यावेळी सांगितले.
                                                                                                                                    ..2 ..

इन्फोसिसमधून 10 वर्षात 14 हजार अभियंत्यांना नोकऱ्या     ..2..
                                   
                                                                        मुकुल वासनिक
            इन्फोसिस कंपनी ही आय.टी क्षेत्रातील कोहिनूर आहे. मुख्यमंत्री एम.ए.डी.सी कंपनीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी व्यक्तिश: विशेष आर्थिक क्षेत्रात मोठया कंपन्या येण्यासाठी प्रयत्न केले.  मिहानसाठी जमीन देणाऱ्या भूमिपुत्रांना योग्य मोबदला मिळावा म्हणून, काही  नवे निर्णयही घेतले.   यासाठी मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीची साथ मिळाली. त्यामुळे विदर्भातील  मिहान प्रकल्पात लवकरच मोठया कंपन्या येतील यात शंका नाही. मिहान मध्ये उद्योगांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत, असेही मुकुल वासनिक यांनी आपल्या भाषणात सांगितले.
                                                                  एस. डी. शिबुलाल
       नागपूर हे भारतातील मध्यवर्ती ठिकाण आहे. आसपासच्या परिसरात 70 च्यावर अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. उद्योगासाठी आवश्यक असलेल्या सुविधाही मिहानमध्ये असल्यामुळे इन्फोसिस कंपनीने येथे विकास केन्द्र सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे इन्फोसिस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकरी एस.डी. शिबुलाल यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्यानंतर उपस्थितांसमोर आपले मनोगत  व्यक्त केले.
            महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यू.पी.एस. मदान यांनी यावेळी पाहुण्याचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी मिहानच्या सोयी सुविधांचे वृत्तचित्रही पाहुण्यांना दाखविण्यात आले.
या समारंभास पालकमंत्री शिवाजीराव मोघे, रोहयोमंत्री डॉ. नितिन राऊत, अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख, वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक, इन्फोसिस कंपनीचे उपाध्यक्ष चंद्रकेतू झा, निलाग्री, मृत्यूंजय सिंग, आमदार सर्वश्री. सुनील केदार, दीनानाथ पडोळे, एस. क्यू. जमा, विजय घोडमारे, निलेश पारवेकर, माजी आमदार यादवराव देवगडे, रमेश बंग,सतीश चतुर्वेदी, रोहिदास पाटील, गेव्ह आवारी, अशोक धवड, जि.प. अध्यक्ष सुरेश भोयर, नाना गावंडे, दीपक काटोले, बाबा डवरे, वेदचे विलास काळे, विदर्भ इंन्डस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल दोशी, जयप्रकाश गुप्ता, विकास ठाकरे, मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव अजीत कुमार जैन, सचिव डॉ. पी.एस. मीना, विशेष कार्य अधिकारी एस. शहजाद हुसेन, विभागीय आयुक्त वेणू गोपाल रेड्डी, पोलिस आयुक्त डॉ. अंकुश धनविजय, जिल्हाधिकारी सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल, मुख्य कार्यपालन अधिकारी अमित सैनी  उपस्थित होते                                                                 
            कार्यक्रमाचे संचालन एम.ए.डी .सी जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी यांनी केले.
                                                                        ****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा