मंगळवार, ३० जून, २०१५

बी.एड अभ्यासक्रम आता दोन वर्षांचा शैक्षणिकवर्षापासून होणार अंमलबजावणी

मुंबई दि 29: राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (एनसीटीई)च्या अधिसूचनेप्रमाणे राज्यात शासकीय व अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित व कायम अनुदानित अध्यापक महाविद्यालयातील नियमित
बी. एड. अभ्यासक्रम दोन वर्षांचा करण्यात आला आहे. 2015-16 पासून याबाबतची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
            2015-16 या शैक्षणिक वर्षासाठीच्या बी. एड. (पूर्णवेळ, नियमित) प्रथम वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठीची नियमावली तयार करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील शासकीय, अशासकीय अनुदानित, अशासकीय विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित व अल्पसंख्यांक संस्था संचलित अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयांमध्ये बी. एड. (नियमित) प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) (Common Entrance Test) घेऊन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहे. सदर प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही संगणकामार्फत ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.
            मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या बी. एस्सी. (विज्ञान व गणित इ.), बी.ए (सामाजिक शास्त्रे इतिहास/ भूगोल/ अर्थशास्त्र/ राज्यशास्त्र/ मानसशास्त्र/तत्वज्ञान/ शिक्षण/ग्रंथालय शास्त्र इ.) तसेच बी.ए. मानव्यशास्त्रे (भाषा व साहित्य)) विद्याशाखेची 3 वर्षांची पदवी/ पदव्युत्तर अभ्सासक्रम पूर्ण केला असेल व पदवी किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला खुला संवर्गातील उमेदवाराला किमान 50 टक्के (49.50 ते 49.99 टक्केपर्यंतचे गुणधारकांचे गुण 50 टक्के इतके गणण्यात येतील) व मागासवर्गीय संवर्गातील (अ.जा., अ.ज., वि.जा.भ.ज., इ.मा.व., व वि.मा.प्र.) ज्या उमेदवारांना किमान 45 टक्के गुण (44.50 ते 44.99 टक्केपर्यंतचे गुणधारकांचे गुण 45 टक्के इतके गणण्यात येतील.) महाराष्ट्राबाहेर विद्यापीठातील पदवी प्राप्त सर्व संवर्गातील ज्या उमेदवारांनी किेमान 50 टक्के गुण प्राप्त केले आहेत (49.50 ते 49.99 टक्केपर्यंतचे गुणधारकांचे गुण 50 टक्के इतके गणण्यात येतील) असे उमेदवार बी. एड. प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेस (CET) बसण्यास व बी.एड. प्रवेशास पात्र राहतील.
            अभियांत्रिकी व तंत्रज्ञान मध्ये (गणित व विज्ञान विषय विशेष म्हणून असलेले) उमेदवार तसेच मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या (मान्यताप्राप्त विदयापीठाच्या बी.एस्सी (विज्ञान व गणित इ.), बी.ए. (सामाजिक शास्त्रे इतिहास/ भूगोल/ अर्थशास्त्र/ राज्यशास्त्र/ मानसशास्त्र/तत्वज्ञान/ शिक्षण/ग्रंथालय शास्त्र इ.) तसेच बी.ए. (मानव्यशास्त्रे (भाषा व साहित्य) विद्याशाखेची 3 वर्षांची पदवी/ पदव्युत्तर अभ्सासक्रम) मधील सोडून इतर सर्व विद्याशाखांच्या पदव्या (उदा. वाणिज्य, व्यवस्थापन, अभियांत्रिकी,संगणक,विधी, माहिती तंत्रज्ञान, कृषी, बी.बी.आय., वैदयकशास्त्र, समाजशास्त्रातील नमूद केलेले विषय सोडून इतर विषय, फाईन आर्ट, परफॉर्मिग आर्ट-संगीत/नृत्य/नाटय इ.) तसेच महाराष्ट्र शासनाने पदवी समकक्षता दिलेला कोणताही अभ्यासक्रम पूर्ण केला असेल व पदवीला किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाला खुला संवर्गातील उमेदवाराला किमान 55 टक्के गुण (54.50 ते 54.99 टक्के पर्यंतचे गुणधारकांचे गुण 55 टक्के इतके गणण्यात येतील) व मागासवर्गीय संवर्गातील (अ.जा., अ.ज., वि.जा.भ.ज., इ.मा.व., व वि.मा.प्र.) ज्या उमेदवारांना किमान 50 टक्के गुण (49.50 ते 49.99 टक्केपर्यंतचे गुणधारकांचे गुण 50 टक्के इतके गणण्यात येतील.) महाराष्ट्राबाहेर विद्यापीठातील पदवी प्राप्त सर्व संवर्गातील ज्या उमेदवारांनी किमान 55 टक्के गुण प्राप्त केले आहेत (54.50 ते 54.99 टक्केपर्यंतचे गुणधारकांचे गुण 55 टक्के इतके गणण्यात येतील.) असे उमेदवार बी.एड. प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेस (CET) बसण्यास व बी.एड. प्रवेशास पात्र राहतील.दोन वर्षाच्या किंवा एक वर्ष अभ्यासक्रमाची पदवी धारण करणारे पदवीधारक उमेदवार (मुक्त विदयापीठातील पदवीप्राप्त उमेदवार वगळून) बी.एड. प्रवेशास पात्र राहणार नाहीत.
सवलतीसाठी पात्रता
            1.स्वातंत्र्य सैनिकांची मुले/मुली/पती/पत्नी यांना, 2.प्रकल्पग्रस्त/ भुकंपग्रस्त कुटूंबातील उमेदवारांना, 3.परित्यक्ता/ घटस्फोटित महिला/विधवांना यापैकी कोणत्याही वर्गवारीतील असल्यास संबंधित उमेदवाराने परीक्षेस बसताना पुढील नमूद केलेल्या संवर्गातील सवलत मिळण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. असे प्रमाणपत्र सादर केलेल्या संबंधित उमेदवारासच दोन टक्के अतिरिक्त गुण देण्यात येतील. याबाबतचा शासन अध्यादेश उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत दिनांक 29जून 2015रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा